शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळा रस्त्यापासून वंचित

By admin | Published: December 09, 2015 9:29 PM

खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे

उचगाव : येथील यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर विकास मंडळ (मणेरमळा) परिसरातील १२ कॉलन्यांतील रहिवासी, महिला मंडळ, युवक मंडळ, दहा ते १५ हजार नागरिकांच्यावतीने उचगावच्या सरपंच सुरेखा चौगुले यांना मणेरमळ््यातील रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले. स्वांतत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही मणेरमळ््यात रस्ता नसल्याने ‘कुठे नेऊन ठेवलाय आमचा रस्ता’ असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. कोल्हापूर-हुपरी रोडला जोडला जाणारा यादववाडी, छत्रपती शिवाजीनगर परिसर, मणेरमळा हा रस्ता ४० वर्षे वहिवाट असणारा रस्ता व्हावा म्हणून गेली १२ ते १५ वर्षे येथील जनता उपोषण, रास्ता रोको, मोर्चा, आंदोलन करीत आहे. खासदार, आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारीयांनी वेळोवेळी रस्ता करतो म्हणून हमी दिली आहे; परंतु येथील जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न असणारा दक्षिणोत्तर जवळपास २०० मीटरचा रस्ता आजअखेर नागरिकांना मिळालेला नाही.‘वाडी-वस्ती तिथे रस्ता’ हा केंद्र सरकारचा नियम येथील जनतेला लागू होत नाही का? आदिवासी, दुर्गम भाग या ठिकाणी रस्ते केले जातात. मग कोल्हापूर शहरापासून दोन कि.मी.च्या अंतरावर असणारा हा भाग रस्त्यापासून अजूनही वंचित का रहिला, असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. या रस्त्याने दररोज हजार ते दीड हजार मुले-मुली, नागरिक, वाहनधारक, नोकरदार ये-जा करीत आहेत. शाळा, कॉलेजला जाणारी मुले, मुली, युवक चिखलातून जात आहेत. आजारी रुग्ण, गरोदर मातांना रस्त्याअभावी चारचाकी वाहनातून वेळेत उपचारांसाठी पोहोचता येत नाही. यामुळे गेल्या काही दिवसांत पाच ते दहाजणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. खडकाळ रस्ता असल्याने बस किंवा रिक्षा या भागात येण्यास तयार होत नाहीत. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने चार गरोदर मातांना आपला प्राण गमवावा लागला आहे. दहा ते १५ हजार लोकवस्तीच्या या मणेरमळ््यात वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने व खासगी जमीनदारांकडून रस्त्याला अडवणूक होत असल्याने येथील रस्ता होणार तरी कधी? असा प्रश्न पडला आहे.गेली वीस वर्षे ग्रामपंचायतीला या भागातील नागरिक घरफाळा, इतर कर भरत आहेत. तरीही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या रस्त्याविषयी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप जनतेतून होत आहे. वास्तविक ग्रामपंचायतीने येथील जनतेला विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असताना गेली २० वर्षे दुर्लक्ष केल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर येथील जनतेने मोर्चाने येऊन ग्रामपंचातयीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)