शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा निर्णय

By admin | Published: December 11, 2015 12:34 AM

टोलचा प्रश्न : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन; टोलविरोधी कृती समितीचा निर्णय

कोल्हापूर : शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहेच; तर आता त्याबाबतचा अध्यादेश कधी काढणार, याची विचारणा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन संपताच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय गुरुवारी येथे झालेल्या कोल्हापूर शहर, जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचाही निर्णय यावेळी झाला. भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यापासून शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहे. १ डिसेंबरपूर्वी हा टोल रद्द करून तसा अध्यादेश काढला जाईल, असे आधी सांगण्यात आले; परंतु ही मुदत पुन्हा एक महिन्याने वाढविली. सध्या नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, त्या अधिवेशनात तशी घोषणा करावी आणि अध्यादेश काढावा, अशी आठवण करून देण्यासाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे १६ डिसेंबरला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. विधिमंडळ अधिवेशनात कोल्हापूरच्या टोल आंदोलनाचे पडसाद त्यामध्ये उमटावेत, सभागृहात चर्चा व्हावी, म्हणून पुन्हा एकदा आंदोलन हाती घ्यावे, असा आग्रह बैठकीत धरण्यात आला. यावेळी काहींनी पुन्हा एकदा ‘कोल्हापूर बंद’ करावे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना कोल्हापूर प्रवेश बंद करावा, अशा संतप्त सूचना मांडल्या; परंतु एकदम टोकाची भूमिका न घेता संयमाने आंदोलन करू, असे ठरले. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम १६ डिसेंबर रोजी धरणे धरण्याचा आणि विधिमंडळ अधिवेशन संपताच पालकमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चाची तारीख १६ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)प्रकल्पाची किंमत वस्तुस्थितीवर ठरवारस्तेविकासाची किंमत ही भाजी मंडईतील मालासारखी घासाघीस करून न ठरविता तत्त्वावर तसेच वस्तुस्थितीवर निश्चित करावी, असे सांगतानाच ज्येष्ठ नेते प्रा. पाटील यावेळी म्हणाले की, टोलमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले आहे; त्यामुळे आकडेवारीशी तसेच रकमेशी कृती समितीचा संबंध नाही. ३१ डिसेंबरपूर्वीची मुदत कशी पाळणार, हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. या बैठकीत कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार, दिलीप देसाई, अ‍ॅड. बाबा इंदूलकर, लालासाहेब गायकवाड, आदींची भाषणे झाली. जयकुमार शिंदे यांनी आभार मानले. बैठकीस दिलीप पवार, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर, अशोकराव साळोखे, आदी मान्यवर उपस्थित होते.