शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

मांजरा प्रकल्प: अवकाळीमुळे पाच दलघमी पाण्याची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 8:22 PM

तीन दिवस अगोदर रोटेशन थांबविले.

लातूर :लातूर शहरासह जिल्ह्यात तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसामुळे फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असले तरी मांजरा प्रकल्पातील पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे. प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी थांबविले आहे. यामुळे उजव्या कालव्यातील अडीच दलघमी आणि डाव्या कालव्यातील अडीच दलघमी असे मिळून पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे.

मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून ११ एप्रिल पासून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र मध्येच २० एप्रिल नंतर प्रकल्प आणि पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी बंद झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे प्रशासनाने कालव्यातून सोडलेली पाणी बंद केले आहे. रोटेशन संपण्यापूर्वी तीन दिवस अगोदर कॅनॉल मधून सोडण्यात येणारे पाणी बंद झाल्यामुळे पाच दलघमी पाण्याची बचत झाली आहे. आता शेवटची पाळी ११ ते ३० मे दरम्यान नियोजित आहे. तोपर्यंत उजव्या-डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार नाही. उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी सोडण्यात येणारे रोटेशन हे शेवटचे असणार आहे.

उन्हाळी हंगामात साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली.....

मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून एकूण साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र उन्हाळी हंगामात भिजवले जाते. त्यात उजव्या कालव्याअंतर्गत ३ हजार हेक्टर तर डाव्या कालव्या अंतर्गत साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. कालव्यात पाणी सोडल्यामुळे विहिरी व नदीलाही पाणी वाढते. यामुळेही सिंचन क्षेत्रात वाढ होते. डाव्या आणि उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात पाणी सोडल्यामुळे दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते, अशी माहिती प्रकल्पावरील अधिकारी सुरज निकम यांनी दिली.

मांजरा प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ नाही....मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस मांजरा प्रकल्प क्षेत्रात झाला असला तरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. उन्हाळ्यात कितीही अवकाळी पाऊस मोठा झाला तरी मोठ्या प्रकल्पात पाण्याची वाढ होऊ शकत नाही, असा आज वरचा अनुभव आहे. फायदा एवढाच उजव्या आणि डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी बंद करावे लागले. त्यामुळे पाच दलघमी पाण्याची बचत झाली.

प्रकल्पात ४४.४५ टक्के पाणीसाठा...

मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत ४४.४५ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. सध्या धरणात १२५.७८७ दलघमी एकूण पाणीसाठा आहे. त्यापैकी ७८.६५७ जिवंत पाणीसाठा आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी नियोजन आहे. त्यानुसार शेवटचे रोटेशन ११ ते ३० मे दरम्यान असेल.

टॅग्स :laturलातूर