लोकमत न्यूज नेटवर्कविरार : मुंबई महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून दहा तरूणांची १७ लाख ५६ हजारांची फसवणूक करणाऱ्या किशोर देव आणि गणेश जाधव यांना पोलिसांनी कामोठे येथून अटक केली.या भामट्यांनी दाखवलेल्या आमिषाला चेतन कोळी, भाग्यश्री समरंग, ललिता कोळी, सागर पाटील, रोशन पाटील, जगदीश नायगावकर, ऋषिकेश नायगावकर, वैभव नायगावकर, संजय जाधव हे बळी पडले. भामट्यांनी त्यांना बँक आॅफ महाराष्ट्रमधील खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. रक्काम भरल्यानंतरही इंटरव्ह्यूसाठी कॉल न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपापले पैसे मागण्याचा तगादा लावला. आपली रक्कम परत मिळत नाही हे पाहून या मुलांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
१० तरुणांची फसवणूक
By admin | Published: May 09, 2017 2:22 AM