शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

किडनीच्या आजाराने १४ जणांचा मृत्यू

By admin | Published: August 13, 2014 12:45 AM

कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण

जिल्हा परिषद : सायकल अन् जलशुद्धीकरण घोटाळा गाजलानागपूर : कळमेश्वर तालुक्यातील पानउबाळी येथे फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे गेल्या वर्षभरात १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ ते १० रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामुळे गावातील लोकांत भीतीचे वातावरण असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेतील विरोधीपक्षनेते मनोहर कुंभारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली. मृतांमध्ये किसन शिवणकर, आनंदराव ढोणे, यमुनाबाई डहाट, शंकरराव वानखडे, केशवराव नारनवरे, किसन बाबडे, संतोषराव ढोणे, सूर्याबाई धुंदे, सुमित्रा वाडीवा , रावण सालमुरकर, रमेश मुनघाटे व हिरुबाई जुनघरे आदींचा समावेश आहे. तसेच स्मिताबाई बाबळे (५५) व किशनदेव जुनघरे (६०) यांच्यावर नागपुुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतरही अनेक लोकांना किडनीच्या आजाराने पछाडले आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुंभारे यांनी केली. गावातील पाणी नमुने तपासणीसाठी तातडीने प्रयोगशाळेकडे पाठवा, गावाला सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करून पर्यायी उपययोजना करण्याचे निर्देश उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले. यात आरोग्य विभागातील अधिकारी जबाबदार असल्यास त्यांचेवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चिखले यांनी दिली.महिला व बाल कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या सायकल वाटपात लाखों रुपयांचा घोटाळा झाला आहे. एकाच विद्यार्थ्यांच्या नावाने ८ ते १५ सायकली उचलण्यात आल्या आहेत. यामुळे जि.प.ची बदनामी होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही सायकली मिळाल्या नसल्याचे शांता कुमरे यांनी निदर्शनास आणले. तालुका स्तरावरून आलेल्या नावांनुसार यादी मंजूर करण्यात आल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. काही ठिकाणी अनुसूचित जातीचे लाभार्थी न मिळाल्याने त्यांना वाटप करता आले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी केली. शाळांना बंद असलेली जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आल्याच्या मुद्यावरून चांगलाच गोंधळ झाला. उपासराव भुते यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तेराव्या वित्त आयोगातून शाळांना ७७४ जलशुद्धीकरण यंत्रे पुरविण्यात आली. ती चांगल्या कंपनीची नसल्याने यावर आक्षेप घेण्यात आले. या यंत्रांचा शासन स्तरावरून पुरवठा झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याची सदस्यांना कल्पना न दिल्याबाबत जयकुमार वर्मा व उकेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.कन्हान येथील अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार वाटपात गैरप्रकार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. याबाबत चुकीचा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. मनसर भागातील काही शाळांत विद्यार्थ्याच्या गणवेश वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुष्पा गायकवाड यांनी केला. शालेय गणवेशाची खरेदी स्थानिक स्तरावर व्यवस्थापन समिती करते. या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.(प्रतिनिधी)