शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

शेतकरी दुबार पेरणीच्या चक्रव्यूहात!

By admin | Published: August 13, 2014 12:54 AM

अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे.

पावसाने पुन्हा दडी मारली : कृषी विभागाकडे शेकडो तक्रारीनागपूर : अगोदरच दीड महिना उशिरा आलेला पाऊस शेतकऱ्याशी अक्षरश: लपंडाव खेळत आहे. गत काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. यापूर्वीच पावसाच्या खंडामुळे अनेकांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे अगोदरच त्याला आर्थिक फटका बसला आहे. अजूनपर्यंत कृषी विभागाकडे दुबार व तिबार पेरणीची अधिकृत आकडेवारी प्राप्त झालेली नसली, तरी संपूर्ण विभागात साधारण २५ ते ३० टक्के दुबार पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच १० ते १५ टक्क्यांपर्यंत तिबार पेरणी झाली आहे. यासंबंधी विभागीय कृषी उपसंचालक अजय राऊत यांना विचारणा केली असता, त्यांनी सर्व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांकडून आकडेवारी मागविली असून, अजूनपर्यंत ती प्राप्त झाली नसल्याचे ते म्हणाले. विदर्भात दरवर्षी साधारण जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो. मात्र यंदा तो जुलै महिन्याच्या शेवटी आला. त्यामुळे पेरणीला तब्बल दीड महिना विलंब झाला. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसावर सोयाबीन व कापसाची पेरणी आटोपली. परंतु दोनच दिवसांत पुन्हा पाऊस गायब झाला. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियाणे जमिनीत पचले. १५ दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शेतकरी पुन्हा उत्साहित झाला. तडजोड करून, पुन्हा बी-बियाणे व खतांची खरेदी करून, दुबार पेरणी केली. यावेळी साधारण आठवडाभर पाऊस सुरू राहिला. त्यामुळे पिकांची उगवण सुरू झाली. शेतकरीही आनंदीत झाला. परंतु त्याचा हा आनंद काहीच दिवस टिकला. ऐन शेत अंकुरत असताना पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे माळरान हिरवे होण्यापूर्वीच पुन्हा काळे झाले. यामुळे शेतकरी चांगलाच खचला. काहींनी हिंमत करून, तिसऱ्यांदा पेरणी केली. परंतु अनेकांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांची शेती पडित राहिली. आता गत १५ दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. शेतातील हिरवेगार पीक कोमेजू लागले आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, यंदा पेरणीला साधारण दीड महिन्यांचा विलंब झाला आहे. याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार आहे. सोयाबीनचे पीक पेरणीपासून साधारण १०० ते १०५ दिवसांत कापणीला येते. त्यानुसार जून महिन्यात पेरणी झालेले पीक सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती येते. मात्र यंदा पेरणीच १५ जुलैपासून सुरू झाली आहे. त्यामुळे कापणीचा कालावधी लांबणार आहे. दुसरीकडे त्या पिकाला हवामानातील बदलाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)