शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

सरकारच्या कारभारावर लक्ष

By admin | Published: September 24, 2015 2:15 AM

राज्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना नीट मिळतो की नाही

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना नीट मिळतो की नाही, यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांची फौज नजर ठेवणार आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासाठीची एक योजना तयार केली आहे. दानवे यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले की, या १४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, हे आमचे कार्यकर्ते बघतील़ कुठे उणिवा दिसल्या तर सरकारच्या लगेच नजरेस आणून देतील. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पक्षाच्या दुष्काळ समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांचा एकमेकांशी समन्वय असेल. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये पक्षाकडून एक गाव निवडले जाईल आणि तेथे पक्षाच्या खर्चातून उपाययोजना करण्यात येणार आहेत. या गावांमध्ये किमान एक उल्लेखनीय अशी उपाययोजना पक्षाच्या वतीने केली जाईल. यासाठी चिंतन शिबिरे सुरू असून या ठिकाणी मिळालेली माहिती इतर कार्यकर्ते आणि सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम पक्ष पदाधिकारी/लोकप्रतिनिधी करतील, अशी माहिती दानवेंंनी दिली. पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यात येणार आहे. सरकार आणि पक्षात समन्वय आहेच. त्यासाठी स्थापन केलेल्या भाजपाच्या कोअर कमिटीची दर १५ दिवसांनी बैठक होते, पण खाली थेट गावापर्यंत हा समन्वय राहावा यासाठी नवीन यंत्रणा उपयोगी ठरेल, असे दानवे म्हणाले. सरकार आणि भाजपात समन्वयाचा अभाव असल्याची भावना असताना समन्वयाचा दानवे पॅटर्न येऊ घातला आहे. (विशेष प्रतिनिधी)