मुंबई : गोविंदा पथकात १८ वर्षांखालील मुले व मुलींना सहभागी करून घेऊ नका तसेच २० फुटांच्यावर थरही लावू नका, या उच्च न्यायालयाच्या निर्देशाला विरोध करीत दहीहंडी समन्वय समितीने दहीहंडी ‘थर’थराट सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. उच्च न्यायालयाच्या या निर्देशाबाबत राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करून फेरविचार करावा, अशी विनंती समितीने केली आहे.बालहक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदावर घातलेली बंदी आणि त्यासंबंधी पोलीस कारवाईचे दिलेले निर्देश या संदर्भात दहीहंडी समन्वय समिती शासनाकडे ‘हेलपाटे’ घालत असताना त्यावर थेट उच्च न्यायालयाने निर्बंध आणले. मात्र कारवाईला न जुमानता पूर्वीइतकेच थर लावण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला.
आदेश झुगारून थर चढवणारच!
By admin | Published: August 13, 2014 3:42 AM