शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भात बियाणे खरेदी करताना घ्या काळजी

By admin | Published: May 21, 2016 1:45 AM

हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण व्यवस्थित असेल, असा अंदाज जाहीर केलेला आहे.

वडगाव मावळ : भात हे मावळ विभागातील प्रमुख पीक आहे. त्यातच हवामान विभागाने या वर्षी पावसाचे प्रमाण व्यवस्थित असेल, असा अंदाज जाहीर केलेला आहे. यामुळे शेतकरी भात पीक नियोजनामध्ये व्यस्त आहेत. त्यांनी भात बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. भाताच्या सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडूनच खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी. बियाणे मान्यताप्राप्त व योग्य प्रकारचेच खरेदी करावे. बियाणाच्या पिशवीवर लेबल व सील असावे. लेबलवर संबंधित अधिकाऱ्याची सही असावी. खरेदीची पावती घ्यावी. लेबलवर बियाणाची जात, प्रकार, लॉट नंबर, उगवण शक्ती, आनुवंशिक शुद्धता, बियाणे वापराचा अंतिम दिनांक याचा उल्लेख असेल, याची खात्री करा, असे आवाहन करण्यात आले आहे. मावळात भाताचे पारंपरिक व सुधारित वाणांचा वापर शेतकरी करतात. प्रामुख्याने इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती, कर्जत-३, कर्जत-५ आदी येथील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या वाणांचा शेतकरी वापर करतात. यापैकी काही वाणांची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यातील शासनाच्या वडगाव मावळ संशोधन केंद्रात मिळणाऱ्या इंद्रायणी वाणांचे प्रसारण हे १९८७ रोजी झाले असून, हे वाण लांब, पातळ सुवासिक दाण्याची निमगरवी जात असून, करपा व पर्णकरपा रोगास मध्यम प्रतिकारक असे हे वाण आहे. याचे उत्पादन हेक्टरी ४० ते ४५ क्विंटल मिळते. फुले समृद्धी हा वाण २००७ साली लागवडीखाली आणलेला वाणही इंद्रायणीप्रमाणे भरघोस उत्पादन देतो. तेदेखील लांब आणि पातळ असून, करपा, खोड रोगास मध्यम प्रतिकारक आहे. (वार्ताहर)>योग्य बीजप्रक्रिया आवश्यकबियाणास योग्य ती बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. बी निरोगी व वजनदार असावे. बियाणास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची म्हणजेच १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण तयार करावे. त्यात बी बुडवावे. पाण्यावर तरंगणारे हलके बी नंतर काढून टाकावे. तळाशी राहिलेले जड बी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक तसेच अनुजीवनाशकाची बीजप्रक्रिया करावी. करपा, पर्ण, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रमाणित औषध २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बी आठ तास भिजवावे. >गादी वाफ्यावर करावी पेरणीखरिपासाठी भाताची पेरणी २५ मे ते २५ जूनपर्यंत गादीवाफ्यावर करावी. पेरणीकरिता १ ते १.२० मी. रुंद व ८ ते १० मी. उंच आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफे तयार करणे शक्य नसेल, तर रोप तयार करण्यासाठी थोडी उंचवट्याची जागा निवडून चारी बाजूने खोलगट चरी काढावी. त्यामुळे जास्त पाऊस झाला, तरी पाण्याचा निचरा होईल. एक हेक्टरवर भात लागवडीसाठी १० आर क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. >शेणखत किंवा कंपोस्टचा वापरवाफे तयार करताना १ आर क्षेत्रास २५० किलोग्रॅम शेणखत किवा कंपोस्ट खत आणि १ किलो आवश्यक रासायनिक खत चांगल्या प्रकारे मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपाच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रति आर १ किलो रासायनिक खत द्यावे. पावसाअभावी व इतर कारणाने लागवड लांबणीवर पडली, तर प्रति आर क्षेत्रातील रोपास १ किलो रासायनिक खताचा तिसरा हप्ता द्यावा.