शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

यवतमाळ: शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By admin | Published: July 18, 2016 4:24 PM

शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात जेवणानंतर खेळणा-या सहावीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने बळी गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली.

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १८ - शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात जेवणानंतर खेळणा-या सहावीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने बळी गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यांतर्गत येणाºया  अंतरगाव येथे रविवारी दुपारी घडली. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढले असून या शाळा प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी एका निरागस बालकाला आपला जीव गमवावा लागला. 
आदित्य रवी टेकाम (११) रा. रुंझा (ता.पांढरकवडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवार १७ जुलै रोजी शाळेला सुटी असल्याने दुपारच्या जेवणानंतर सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आश्रमशाळेच्या प्रांगणात खेळत होते. आदित्य टेकाम व त्याचे काही मित्र आश्रमशाळेच्या प्रांगणात असलेल्या रंगमंचाकडे खेळण्यासाठी गेले. हा संपूर्ण परिसर झुडुपाने व्यापलेला आहे. या ठिकाणी खेळत असताना काही तरी चावल्याचे आदित्यच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार सोबतच्या सहकाºयांना सांगितला. थोड्या वेळातच त्याची प्रकृती गंभीर होत गेली. त्यावेळी सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले. 
आश्रमशाळेतील कर्मचाºयांनी थोडाही विलंब न करता त्याला मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ८.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. आदित्य हा रुंझा येथील एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे. आठ दिवसापूर्वीच त्याने या आश्रमशाळेत प्रवेश घेतला होता. दरम्यान पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना (आयएएस) यांनी आदित्यच्या कुटुंबाला ७५ हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
वॉलकंपाऊंंड वाहून गेले
अंतरगाव शासकीय आश्रमशाळेचे वॉलकंपाऊंड पाच वर्षांपूर्वी पुराने वाहून गेले. पुन्हा उभे करण्याची सोय संबंधित विभागाने लावली नाही. याच परिसरात गवत वाढले असून तेथेच रंगमंच आहे. पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या आश्रमशाळेत एकूण २२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये दोन अधीक्षक, मुख्याध्यापक, दहा शिक्षक, तीन स्वयंपाकी, चार कामाठी, एक चौकीदार आणि एक लिपिक आहेत. आदित्यला सर्पदंश झाल्यानंतर सर्व कर्मचाºयांनी तत्काळ रुग्णालयात हलविले. 
मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अंतरगाव आश्रमशाळेतील आदित्य रवी टेकाम याचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.