लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव (रायगड) : गोरेगाव शहरालगतच्या काळ नदी पुलावर रविवारी दुचाकीच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. उमेश भात्रे (रा. देवळी) आणि शिवदास ाळवटकर (२४, रा. गोरेगाव) हे काळ नदी पुलावरून जात असताना समोरून आलेल्या वाहनाचे लाइट डोळ्यावर आल्याने दुचाकीवरील ताबा सुटला. या अपघातात उमेश भात्रे पुलाच्या कठड्यावर आदळला. मात्र, मागे बसलेला शिवदास संतोष तळवटकर हा नदीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
काळ नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2017 2:24 AM