Join us

CoronaVirus : राज्यात कोरोनाचे ४४० नवे रुग्ण, आतापर्यंत बळींचा आकडा पोहोचला ३४२ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 8:05 PM

CoronaVirus : राज्यात १९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळींचा आकडा ३४२ झाला आहे.

मुंबई : राज्यात रविवारी ४४० कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या ८ हजार ६८ वर पोहोचली आहे. 

राज्यात १९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण बळींचा आकडा ३४२ झाला आहे. तर मुंबईत दिवसभरात ३५८ इतके कोरोना रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४०७ इतकी झाली आहे. शहर उपनगरात रविवारी १२ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृत्यू २०४ झाले आहेत.

राज्यात नोंद झालेल्या १९ मृत्यूंपैकी १२ मुंबईतील, तीन पुणे महानगरपालिका, दोन जळगाव आणि प्रत्येकी एक सोलापूर शहर व लातूर येथील आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ५१९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. 

राज्यात रविवारी ११२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, आजपर्यंत ११८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ९२६ लोक घरगुती अलगीकऱणात आहेत, तर ९ हजार १६० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस