Coronavirus: ‘वांद्र्याच्या प्रकारानंतर भाजपा नेते अचानक सक्रीय झाले; मुख्यमंत्र्यांविरोधात हॅशटॅश चालवला’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 07:18 PM2020-04-17T19:18:19+5:302020-04-17T19:20:34+5:30

काही लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, लष्कर बोलवावे इथपर्यंत मागण्या केल्या

Coronavirus: Congress Leader Balasaheb Thorat Target BJP Leader on Bandra Station incident pnm | Coronavirus: ‘वांद्र्याच्या प्रकारानंतर भाजपा नेते अचानक सक्रीय झाले; मुख्यमंत्र्यांविरोधात हॅशटॅश चालवला’

Coronavirus: ‘वांद्र्याच्या प्रकारानंतर भाजपा नेते अचानक सक्रीय झाले; मुख्यमंत्र्यांविरोधात हॅशटॅश चालवला’

Next
ठळक मुद्देही सगळी क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर अशा राष्ट्रीय आपत्तीतही भाजपाचं राजकारण त्यातच मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याचा हॅशटॅग चालवण्यात आला.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर उपस्थित केली शंका

मुंबई - रेल्वेच्या गलथान कारभारामुळे वांद्र्यात गर्दी जमा झाली होती परंतु त्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी या संधीचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला अशी शंका घेण्यास जागा आहे असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर लावला आहे.

याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, मुख्यमंत्री तसेच सोनिया गांधी यांनाही राजकारण करण्याची ही वेळ नाही असे आवाहन केले असताना भाजपाकडून मात्र राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे हे दुर्दैवी आहे. वांद्र्याचा प्रकार घडल्यानंतर भाजपाचे नेते अचानक सक्रीय झाले. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी राज्य सरकारवर अपयशाचे खापर फोडण्याचा केवीलवाणा प्रयत्न केलाच परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. ही तत्परता त्यांनी सुरत, हैदराबादमध्ये आणि दिल्लीत झालेल्या अशाच घटनावेळी दाखवलेली दिसत नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच काही लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, लष्कर बोलवावे इथपर्यंत मागण्या केल्या. त्यातच मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याचा हॅशटॅग चालवण्यात आला. ही सगळी क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर अशा राष्ट्रीय आपत्तीतही राजकारण करण्याची संधी विरोधकांनी शोधली हे दुर्दैवी आहे असा टोला बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला लगावला.

दरम्यान, कोरोना विषाणुचा पहिला रुग्ण राज्यात सापडला त्यादिवसापासूनच महाविकास आघाडी सरकारने त्यावर मात करण्यासाठी पावले उचलली आहेत. कोरोनानंतर उद्भवलेली परिस्थीती राज्य सरकार समर्थपणे हाताळत आहे. केंद्र सरकारकडून पीपीई कीटसह आवश्यक वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणात मिळणे अपेक्षित असताना ती मिळत नाही याकडे लक्ष वेधून देत बाळासाहेब थोरात यांनी केंद्राने जीएसटीचे १६५०० कोटी रुपये द्यावेत तसेच कोरानाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी केलेली आहे.

थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले की,  देशात सर्वात आधी लॉकडाऊन महाराष्ट्राने लागू केला.आरोग्य विभाग युद्धपातळीवर काम करत असून इतर यंत्रणांच्या माध्यमातून गरिब व गरजू लोकांना अन्नधान्य पोहचवण्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. अन्न सुरक्षा कायद्यांच्या लाभार्थ्यांसह इतरांनाही धान्य दिले जात असून त्यांची संख्या ७.५ कोटी एवढी आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांनाही अन्नधान्य दिले जात आहे. सरकारी यंत्रणेप्रमाणेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही या मदत कार्यात मैदानात उतरलेले आहेत असं ते म्हणाले.

 

Web Title: Coronavirus: Congress Leader Balasaheb Thorat Target BJP Leader on Bandra Station incident pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.