मुंबई - जागावाटपाबाबत योग्य तोडगा निघत नसल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीचे घोडे अडले आहे. दरम्यान, जागावाटपात शिवसेनेला समान जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी केले केले होते. आता रावतेंच्या या विधानाला संजय राऊत यांनीही पाठिंबा दिला आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वाटाघाटीत समान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे रावतेंनी केलेले विधान चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Vidhan Sabha 2019: ...तर युती तुटणार? संजय राऊतांचा रावतेंच्या सुरात सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 12:30 IST
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - जागावाटपाबाबत योग्य तोडगा निघत नसल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीचे घोडे अडले आहे.
Vidhan Sabha 2019: ...तर युती तुटणार? संजय राऊतांचा रावतेंच्या सुरात सूर
ठळक मुद्देजागावाटपाबाबत योग्य तोडगा निघत नसल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीचे घोडे अडले जागावाटपात शिवसेनेला समान जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी केले केले होतेरावतेंच्या या विधानाला संजय राऊत यांनीही पाठिंबा दिला आहे