अत्याचार झाला, आयुष्याचं लक्तर बनलं; पण 'मनोधैर्य' योजनेनं सावरलं! किती मिळते मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:21 IST2024-12-17T16:18:09+5:302024-12-17T16:21:45+5:30

पीडितांना किमान २ लाख ते कमाल १० लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. 

Manodhairya scheme helped rape victims How much help get | अत्याचार झाला, आयुष्याचं लक्तर बनलं; पण 'मनोधैर्य' योजनेनं सावरलं! किती मिळते मदत?

अत्याचार झाला, आयुष्याचं लक्तर बनलं; पण 'मनोधैर्य' योजनेनं सावरलं! किती मिळते मदत?

मुंबई

राज्यात बलात्कार, अॅसिड हल्ला, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिला आणि बालकांचे पुनर्वसन करता यावे, यासाठी राज्य सरकारने मनोधैर्य योजना सुरू केली असून २ ऑक्टोबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी होत आहे. पीडित महिला आणि बालकांना अर्थसाहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणारी महिला व बाल विकास विभागाची ही महत्वाची योजना आहे. यामध्ये पीडितांना किमान २ लाख ते कमाल १० लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. 

पीडितांना वैद्यकीय व मानसिक आधार मिळवून देणे, समुपदेशन करणे, कायदेशीर सल्ला देणे, त्यांना नोकरी व व्यावसायिक प्रशिक्षण देणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. 

कुठे करावा अर्ज?
- संबंधित क्षेत्रातील महिला व बालविकास विभाग कार्यालयात यावे. 
- मनोधैर्य योजनेचा अर्ज घेऊन तो काळजीपूर्वक वाचावा. 
- अर्जातील विचारलेली सर्व माहिती अचूक भरुन आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत. 
- भरलेला अर्ज त्याच कार्यालयातील विभागात जमा करावा. 
- अर्ज व सोबत जोडलेल्या कागदपत्र तपासणीनंतर लाभ दिला जातो. 

योजनेच्या अटी व शती
- राज्यातील पीडितांनाच या योजनेचा लाभ मिळतो. 
- पीडितांना गृह किंवा अन्य विभागांमार्फत असणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नाही. 
- पीडित महिला व बालकाचे स्वत:चे बँक खाते असणे आवश्यक. 
- पीडित सज्ञान नसल्यास पालकांच्या नावे बँक खाते गरजेचे. 
- पीडिताने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणे अनिवार्य आहे.

Web Title: Manodhairya scheme helped rape victims How much help get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई