Join us  

पनवेलकरांना मीटरने पाणी

By admin | Published: December 12, 2014 10:43 PM

पनवेलकरांना मिळणा:या पाण्याचे अचूक मोजमाप करण्याकरिता मीटर बसविण्याचा विषय गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होता.

पनवेल : पनवेलकरांना मिळणा:या पाण्याचे अचूक मोजमाप करण्याकरिता मीटर बसविण्याचा विषय गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होता. पाणी गळती आणि तूट कमी करण्याकरिता शहरात सुमारे दहा हजार मीटर बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्याला पालिकेच्या सभेत दोन दिवसांपूर्वी हिरवा कंदील मिळाला. लवकरच प्रस्ताव तांत्रिक मंजुरीकरिता एमजेपीकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर लागलीच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पनवेल शहराला दररोज 24 एमएलडी पाण्याची गरज आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणातून 16 एमएलडी पाणी जानेवारी ते मार्चर्पयत येते. उर्वरित पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून विकत घेतले जाते. एकंदरीत देहरंग धरण आणि एमजेपी व एमआयडीसीकडून आलेले पाणी किती खर्च होते, त्याचबरोबर शहराला नेमकी किती पाण्याची गरज आहे, याबाबत इत्यंभूत माहिती मिळत नाही. एकंदरीत पाण्याचे अचूक ऑडिट होत नसल्याने पालिकेला पाण्यापोटी कोटय़वधी रुपये खर्च येत आहे. एमजेपीकडून थकबाकीसाठी पालिकेला वारंवार तगादा लावण्यात येत आहे. एवढेच नाही तर पाणीपुरवठा खंडित करण्याची धमकीही दिली जात असे. कोटय़वधी रुपये पाण्यात जात असल्याने पनवेलमध्ये मीटरप्रमाणो पाणीपुरवठा करण्यात यावा, असा प्रस्ताव तत्कालीन नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर आणि सुनील मोहोड यांच्या काळात पुढे आला होता. त्यावेळचे पाणीपुरवठा सभापती सुभाष भुजबळ, जयवंत महामुनी यांनीही मीटरकरिता आग्रह धरला होता, मात्र पालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. 
नगराध्यक्षा चारुशीला घरत यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याकरिता पुढाकार घेतला. मध्यंतरी निवडणुका जाहीर झाल्याने हा विषय काहीसा मागे पडला, परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या पालिकेच्या सभेत मीटर बसविण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला. (वार्ताहर)
 
खाजगी एजन्सीला काम 
पनवेल शहरात सुमारे दहा हजार मीटर बसविण्यात येणार असून हे काम खाजगी एजन्सीच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव आहे. अर्धा इंची कनेक्शन असणा:या रहिवाशांना पालिका मीटर बसविणार, मोठय़ा सोसायटय़ांना मीटर बसविण्यासाठी नोटीस देणार.
 
तितकेच पैसे
मीटर बसवल्यानंतर जितके पाणी वापरले जाईल तितके पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे पाण्याचे ऑडिट करणो शक्य होणार आहे.पाण्यामुळे निर्माण होणारी तूट अडीच पटीने कमी होणार असून बचत होणार आहे. 
 
मनसोक्त पाणी भरा
पनवेल पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पनवेलमधील इमारती आणि घरांना पाणी सोडले जाते. नळजोडणी आकारून पालिकेने पाण्याचे दर ठरवले असून त्यानुसार पाणीपट्टी वसूल केली जाते. ठराविक रक्कम भरा आणि मनसोक्त पाणी भरा, अशी स्थिती पनवेलमध्ये आहे. व्यावसायिक घरगुती दराने पाणीपट्टी भरून व्यावसायिकीकरणासाठी पाणी वापरतात.