जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकमत - राम शिंदे

By admin | Published: July 11, 2017 03:48 PM2017-07-11T15:48:29+5:302017-07-11T16:36:09+5:30

लोकमत समूह सामाजिक बांधिलकी जपणारा समूह आहे. जनसामान्यांचा आवाज म्हणजेच लोकमत

People's voice is Lokmat - Ram Shinde | जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकमत - राम शिंदे

जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकमत - राम शिंदे

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - लोकमत समूह सामाजिक बांधिलकी जपणारा समूह आहे. जनसामान्यांचा आवाज म्हणजेच लोकमत असे कौतुक गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी लोकमतचे केले. त्यांनी लोकमतने जलयुक्त शिवाराच्या कामचा घेतलेल्या आढाव्याचे कौतुकही केले. ते लोकमत वॉटर समिट 2017 च्या कार्यक्रमात बोलत होते. जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज मंगळवार, ११ जुलै रोजी लोकमत वॉटर समिट २०१७चे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जलयुक्त शिवारचे कौतुक केले आहे, प्रथमच शेतीचा विचार गांभीर्याने करण्याच आला आहे. जलयुक्त शिवारमुळे राज्यात क्रांती झाली. जलयुक्त शिवार ही लोक चळवळ आहे. जलयुक्त शिवारासाठी लोकांनी भरपूर मदत केली. जनसामान्यांनी जलयुक्त शिवरासाठी 540 कोटी उभे केल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले, की राज्यातील दुष्काळी भागात पाणीपुरवणा करण्यासाठी साडेचार हजार टँकरची गरज असते पण जलयुक्त शिवराच्या कामानंतर ती संख्या 700 वर आली आहे.
जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन झाले. अंधेरी पूर्वेकडील आयटीसी मराठा येथे दुपारी १२.३० वाजता वॉटर समिटला प्रारंभ झाला. यावेळी जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उपस्थित होते.

(समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचं - राजेंद्र दर्डा)
(जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकमत - राम शिंदे)
(शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पूर यांचा जवळचा संबंध - संजीव मेहता)
(राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कणीण - राजेंद्र सिंह)

लोकमत मीडियाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उद्घाटन सत्रात स्वागतपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी लोकमतच्या वाचकांचे आभार मानले. जलदूतांच्या जलकथांना राज्यातील लोकमतच्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना दर्डा म्हणाले, जलसंधारणाची राज्याला, मराठवाड्यासारख्या भागांना अतीव गरज आहे. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे गरजेचे आहे, इस्रायलचे उदाहरण जगाने समोर ठेवावे. जलयुक्त शिवारचे यश महत्त्वाचे, पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणावा. यावेळी बोलताना त्यांनी जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या कामाचा गौरवही केला.
जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना भारतातील पाण्याची स्थिती आण जलयुक्त शिवाराचे काम का गरजेच आहे याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जगातील पाण्याची उपलब्धता दोन हजार वर्षांपूर्वी जेवढी होती, तेवढीच आजही आहे, पण लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे पाणी नियोजन महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही.

Web Title: People's voice is Lokmat - Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.