आपद्ग्रस्तांचे संसार पुन्हा उभारू

By admin | Published: December 28, 2015 03:48 AM2015-12-28T03:48:52+5:302015-12-28T03:48:52+5:30

भीषण आगीमध्ये ज्या दामूनगरवासियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांचे संसार सरकार पुन्हा उभे करेल, असे आश्वासन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी दिले.

Reopen the World of Conflict | आपद्ग्रस्तांचे संसार पुन्हा उभारू

आपद्ग्रस्तांचे संसार पुन्हा उभारू

Next

मुंबई : भीषण आगीमध्ये ज्या दामूनगरवासियांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांचे संसार सरकार पुन्हा उभे करेल, असे आश्वासन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी दिले. कांदिवली पूर्व येथील दामूनगर या ठिकाणी आपद्ग्रस्त रिलीफ समितीच्या वतीने पुनर्वसन व शासकीय मदतकार्याबाबत जाहीर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तावडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तावडे यांनी काही कुटुंबाशी संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय पुढील मदत लवकरात लवकर देण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तावडे म्हणाले की, ‘आपद्ग्रस्तांना त्यांच्या हक्काचा निवारा उभारण्यात सरकार सर्वोतोपरी मदत करत आहे. पुनर्वसनामध्ये आवश्यक मदत सरकार देईल. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह सरकारी, जिल्हाधिकारी पातळीवर मदत लवकर मिळवून देण्यासाठी समितीने खस्ता खाल्ल्या आहेत. त्यामुळे येथील पुनर्वसनाचे श्रेय हे या समितीचे आहे,’ असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Reopen the World of Conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.