मुंबई विभागाचा निकाल ३.८२टक्क्यांनी वाढला; यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली

By रेश्मा शिवडेकर | Published: May 21, 2024 04:13 PM2024-05-21T16:13:37+5:302024-05-21T16:13:53+5:30

यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २,९४,१५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९३.८० टक्के आणि मुलांची ९०.२२ टक्के आहे.

Results of Mumbai division increased by 3.82 percent | मुंबई विभागाचा निकाल ३.८२टक्क्यांनी वाढला; यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली

मुंबई विभागाचा निकाल ३.८२टक्क्यांनी वाढला; यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली

मुंबई- इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत सर्वात तळाला असला तरी यंदा मुंबई विभागीय मंडळाच्या बारावीच्या निकालात ३.८२ टक्क्यांची भर पडली आहे. गेल्या वर्षी ८८.१३ टक्के असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५ टक्के असा वाढला आहे.

यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २,९४,१५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९३.८० टक्के आणि मुलांची ९०.२२ टक्के आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वधिक म्हणजे ९६.३५ टक्के इतका लागला आहे. तर इतर शाखांमध्ये कला शाखेचा ८३.५६ टक्के, कॉमर्स शाखेचा निकाल ९०.८५ टक्के लागला आहे. तर व्होकेशनलचा निकाल ९०.८५ आणि तंत्रज्ञान विज्ञान शाखेचा ८६.१० टक्के इतका निकाल लागला आहे.

मुंबईचा गेल्या काही वर्षातील निकाल

२०२४ - ९१.९५ टक्के
२०२३ - ८८.१३ टक्के
२०२२ - ८९.७ टक्के

परीक्षेला बसलेल्या एकूण मुली - १,५४,२९८, उत्तीर्ण - १,४४,७४२
परीक्षेला बसलेले एकूण मुलगे - १,६५,६१२, उत्तीर्ण - १,४९,४१६

रिपिटर्सचा निकाल २० टक्क्यांनी वाढला

मुंबई विभागाचा रिपिटर्सचा निकाल ६३.३३ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या (४३.१७ टक्के)तुलनेत यात २० टक्क्यांनी भर पडली आहे. एकूण ३३,०३७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पुन्हा दिली होती. त्यापैकी २०,९२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचा निकाल ६५.६५ टक्के तर मुलांचा ६१.६५ टक्के लागला आहे.

शाखानिहाय परीक्षा दिलेले नियमित व उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान - १,१७,२४९ उत्तीर्ण - १,१२,९७९
कला - ४०,४६० उत्तीर्ण - ३३,८१२
कॉमर्स - १,५८,०४० उत्तीर्ण - १,४३,६२८
व्होकेशनल - ३,२९० उत्तीर्ण - २,९८९
तंत्रज्ञान विज्ञान - ८७१ उत्तीर्ण - ७५०

बारावीची विद्यार्थी संख्या ९,४२७ने घटली

गेल्या वर्षी मुंबईतून ३,२९,३३७ (उत्तीर्ण २,९०,२५८)विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यंदा हा आकडा ३,१९,९१० आहे.

काही विषयांचा निकाल

विषय…… परीक्षार्थी ……. उत्तीर्ण …… टक्केवारी
इंग्रजी……३,४५,३९८…….३२१९६२……९३.२१
मराठी……९६७०९………..९३३६७……..९६.५४
हिंदी………१२९३९६………१२२८६०……९५.९५
इतिहास….३८०३२………..३३३०४……..८७.५७
भूगोल……..४९२४५………४७३८०………९६.२१
गणित-संख्याशास्त्र….९५९२०……९०४८४…..९४.३३
राज्यशास्त्र…२६४०५……..२४४३६…….९२.५४
बीके………१७२२१४……..१५४४६९…….८९.७०
अर्थशास्त्र….२१६२१८…….१९४९९७……..९०.१९
भौतिकशास्त्र….१२६२९८….१२२०१४……९६.६१
रसायनशासत्र…१२६१०५….१२३११५……९७.६३
जीवशास्त्र…..८६०७९…….८३३३४………९६.८१

गुणवत्तेत वाढ

यंदा ४५,९७२ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३८,६३४ होती. तर यंदा ८७,०५९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा ७५,५९३ होता. तर द्वितीय श्रेणी यंदा १,१८,७८८विद्यार्थ्यांना आहे. गेल्या वर्षी ही संख्या १,२०,६९२ होती.

Web Title: Results of Mumbai division increased by 3.82 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.