Join us  

मुंबई विभागाचा निकाल ३.८२टक्क्यांनी वाढला; यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली

By रेश्मा शिवडेकर | Published: May 21, 2024 4:13 PM

यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २,९४,१५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९३.८० टक्के आणि मुलांची ९०.२२ टक्के आहे.

मुंबई- इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत सर्वात तळाला असला तरी यंदा मुंबई विभागीय मंडळाच्या बारावीच्या निकालात ३.८२ टक्क्यांची भर पडली आहे. गेल्या वर्षी ८८.१३ टक्के असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५ टक्के असा वाढला आहे.

यंदा मुंबईतून एकूण ३,१९,९१० नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २,९४,१५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९३.८० टक्के आणि मुलांची ९०.२२ टक्के आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वधिक म्हणजे ९६.३५ टक्के इतका लागला आहे. तर इतर शाखांमध्ये कला शाखेचा ८३.५६ टक्के, कॉमर्स शाखेचा निकाल ९०.८५ टक्के लागला आहे. तर व्होकेशनलचा निकाल ९०.८५ आणि तंत्रज्ञान विज्ञान शाखेचा ८६.१० टक्के इतका निकाल लागला आहे.मुंबईचा गेल्या काही वर्षातील निकाल

२०२४ - ९१.९५ टक्के२०२३ - ८८.१३ टक्के२०२२ - ८९.७ टक्केपरीक्षेला बसलेल्या एकूण मुली - १,५४,२९८, उत्तीर्ण - १,४४,७४२परीक्षेला बसलेले एकूण मुलगे - १,६५,६१२, उत्तीर्ण - १,४९,४१६रिपिटर्सचा निकाल २० टक्क्यांनी वाढला

मुंबई विभागाचा रिपिटर्सचा निकाल ६३.३३ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या (४३.१७ टक्के)तुलनेत यात २० टक्क्यांनी भर पडली आहे. एकूण ३३,०३७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पुन्हा दिली होती. त्यापैकी २०,९२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचा निकाल ६५.६५ टक्के तर मुलांचा ६१.६५ टक्के लागला आहे.शाखानिहाय परीक्षा दिलेले नियमित व उत्तीर्ण विद्यार्थी

विज्ञान - १,१७,२४९ उत्तीर्ण - १,१२,९७९कला - ४०,४६० उत्तीर्ण - ३३,८१२कॉमर्स - १,५८,०४० उत्तीर्ण - १,४३,६२८व्होकेशनल - ३,२९० उत्तीर्ण - २,९८९तंत्रज्ञान विज्ञान - ८७१ उत्तीर्ण - ७५०बारावीची विद्यार्थी संख्या ९,४२७ने घटली

गेल्या वर्षी मुंबईतून ३,२९,३३७ (उत्तीर्ण २,९०,२५८)विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यंदा हा आकडा ३,१९,९१० आहे.काही विषयांचा निकाल

विषय…… परीक्षार्थी ……. उत्तीर्ण …… टक्केवारीइंग्रजी……३,४५,३९८…….३२१९६२……९३.२१मराठी……९६७०९………..९३३६७……..९६.५४हिंदी………१२९३९६………१२२८६०……९५.९५इतिहास….३८०३२………..३३३०४……..८७.५७भूगोल……..४९२४५………४७३८०………९६.२१गणित-संख्याशास्त्र….९५९२०……९०४८४…..९४.३३राज्यशास्त्र…२६४०५……..२४४३६…….९२.५४बीके………१७२२१४……..१५४४६९…….८९.७०अर्थशास्त्र….२१६२१८…….१९४९९७……..९०.१९भौतिकशास्त्र….१२६२९८….१२२०१४……९६.६१रसायनशासत्र…१२६१०५….१२३११५……९७.६३जीवशास्त्र…..८६०७९…….८३३३४………९६.८१गुणवत्तेत वाढ

यंदा ४५,९७२ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ३८,६३४ होती. तर यंदा ८७,०५९ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा ७५,५९३ होता. तर द्वितीय श्रेणी यंदा १,१८,७८८विद्यार्थ्यांना आहे. गेल्या वर्षी ही संख्या १,२०,६९२ होती.