Join us  

रिक्षा जाळपोळप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Published: March 12, 2016 2:39 AM

अंधेरी येथे रिक्षाची जाळपोळ केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत

मुंबई : अंधेरी येथे रिक्षाची जाळपोळ केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.अंधेरी आरटीओबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाची गुरुवारी रात्री ११च्या सुमारास जाळपोळ करण्यात आली होती. रिक्षाचालक बाहेर असल्याने बचावला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी शुक्रवारी अंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन परवान्याच्या रिक्षा दिसल्या तर त्या जाळा, अशी चिथावणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर अंधेरीतील चार बंगला परिसरात अज्ञातांनी रिक्षाची जाळपोळ केली. त्यामुळे या घटनेमागे मनसेचा हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)