सेल्फीच्या नादात गमावला जीव

By admin | Published: November 4, 2015 03:45 AM2015-11-04T03:45:21+5:302015-11-04T03:45:21+5:30

मोबाईलमधून सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर एका १४ वर्षीय मुलाचाही जीव गेल्याची

Selfie lost souls | सेल्फीच्या नादात गमावला जीव

सेल्फीच्या नादात गमावला जीव

Next

मुंबई : मोबाईलमधून सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावर एका १४ वर्षीय मुलाचाही जीव गेल्याची घटना घडली. साहिल इस्वलकर असे जीव गमावलेल्या मुलाचे नाव असून ट्रेनच्या टपावर फोटो काढताना ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कांजुरमार्ग नेहरु नगर येथे राहणारा साहिल आपल्या मित्रांसोबत नाहूर येथील मैदानात गेला होता. त्यानंतर मोबाईलमधून फोटो काढण्यासाठी नाहूरजवळील रेल्वे यार्डात तो आपल्या मित्रांसोबत गेला. त्यावेळी तेथेच उभ्या असणाऱ्या एका ट्रेनच्या डब्यावर तो चढला. मोबाईलमधून सेल्फी काढत असतानाच साहिल हा ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आला आणि मोठ्या प्रमाणात भाजला. मित्रांनी हे पाहताच त्याची माहिती त्यांनी त्याच्या नातेवाईकांना घटनेची दिली.

लोकलमधून पडून
तीन जण ठार
दोन वेगवेगळ्या घटनेत लोकलमधून पडून तीन जण ठार झाल्याची घटना मुंब्रा जवळ घडली. सकाळी पावणे सातच्या सुमारास एक अठरा वर्षीय मुलाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. अप धीम्या मार्गावर ही घटना घडली.
त्यानंतर शब्बीर मुल्ला (२१) आणि अल्ताफ शेख (१९) हे दोघे अप धीम्या मार्गावरील लोकलमधून पडले आणि त्यांचाही जागीच मृत्यू झाल्याचे ठाणे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. सकाळी ९.५५ च्या
सुमारास ही घटना घडली. हे दोघे मुंब्रा येथे राहणारे आहेत.

Web Title: Selfie lost souls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.