मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनावेळी आझाद काश्मीरचा फलक लावल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या सी समरी रिपोर्टवरून भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या "हातात" मुंबई पोलिस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार का? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.याबाबत केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात, कसाबचा पाहुणचार बिर्याणीने केला, कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो. त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट? आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या "हातात" मुंबई पोलिस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? अशी विचारणा केली आहे.
‘’ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट?’’ भाजपाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 15:11 IST