तीन सीआयएसएफ हवालदार बुडणाऱ्या लोकांसाठी देव बनून आले; त्यांच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 08:30 IST2024-12-19T08:28:06+5:302024-12-19T08:30:33+5:30

मुंबईत प्रवाशांनी भरलेल्या बोटाला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली. धडकेनंतर प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. या अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Three CISF constables became gods to the drowning people; their courage averted a major tragedy | तीन सीआयएसएफ हवालदार बुडणाऱ्या लोकांसाठी देव बनून आले; त्यांच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली

तीन सीआयएसएफ हवालदार बुडणाऱ्या लोकांसाठी देव बनून आले; त्यांच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली

गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी दुपारी जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत प्रवासी बोट समुद्रात बुडून १३ जणांचा मृत्यू, तर ९९ प्रवाशांना वाचविण्यात यश आले. या घटनेत मृत्यूंची संख्या वाढली असती पण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तीन हवालदारांच्या धाडसामुळे बुधवारी मोठी दुर्घटना टळली.

मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली; १३ मृत्यू, ९९ जणांना वाचविण्यात यश

कॉन्स्टेबल अमोल मारुती सावंत, विकास घोष आणि अरुण सिंग हे अपघात स्थळापासून अवघ्या ४-५ किलोमीटर अंतरावर गस्त घालत होते आणि ते जवाहर दीप बेटाकडे निघाले होते. सीआयएसएफ नियंत्रण कक्षाकडून एसओएस कॉल मिळाल्यावर, कॉन्स्टेबल सावंत यांनी ताबडतोब आपली गस्ती बोट वळवली आणि उलटलेल्या बोटीच्या ठिकाणी पोहोचले. कॉन्स्टेबल सावंत म्हणाले की, आम्हाला दुपारी ३:५५ वाजता कॉल आला आणि आम्ही १,६०० आरपीएम वेगाने प्रवास करत ४:०५ वाजता त्या ठिकाणी पोहोचलो आणि बचाव कार्य सुरू केले.

सावंत यांनी सांगितले की, आम्ही पोहोचलो तेव्हा संपूर्ण बोट उलटली होती. बोटीवर ३ ते ११ वर्षे वयोगटातील ९-१० मुले होती. आम्ही ज्याची सुटका केली तो तीन वर्षांचा मुलगा होता. सर्व मुलांना वाचवण्याला आमचे प्राधान्य होते आणि आम्ही त्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात यशस्वी झालो, दुर्दैवाने एका मुलाचा जीव गेला.

सावंत म्हणाले की, भयानक दृश्य पाहून लोक किंचाळत होते, प्रवासी घाबरले होते आणि मदतीसाठी आवाज देत होते. त्यांच्या गस्ती नौकेची क्षमता १५ प्रवाशांची असूनही, आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी पथकाने २५-३० लोकांना बोटीवर घेतले. त्यांनी ताबडतोब सुटका केलेल्यांना परिसरातून जाणाऱ्या जेएनपीटी बोटीमध्ये हलवले.

सावंत म्हणाले की, सुटका करण्यात आलेले बहुतेक प्रवासी बेशुद्ध होते आणि आम्ही त्यांना दुसऱ्या बोटीत हलवण्यापूर्वी त्यांना सीपीआर दिला, त्यांना जेएनपीटी येथील रुग्णालयात नेले. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०-३५ प्रवाशांना वाचवल्यानंतर नौदल, तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांचे बचाव पथक अतिरिक्त मदत देण्यासाठी पोहोचले आणि त्यानंतर मोठ्या संख्येने लोकांना वाचवण्यात आले.

सीआयएसएफची गस्ती नौका वेळेवर आल्याने मोठी जीवित हानी टळली. सीआयएसएफच्या अधिकृत निवेदनानुसार, इतर एजन्सीच्या मदतीने तीन हवालदारांनी सुमारे ७२ प्रवाशांची यशस्वीरित्या सुटका केली.

Web Title: Three CISF constables became gods to the drowning people; their courage averted a major tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई