शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

काम शांतपणे करा, यशाचा आवाज हाेऊ द्या; माशेलकरांचे पदवीधर अभियंत्यांना पाच मंत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 9:57 PM

Nagpur News तरुण अभियंत्यांवर याची माेठी जबाबदारी आहे. त्यामुळे काम शांतपणे करा पण तुमच्या यशाचा आवाज हाेऊ द्या, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक आणि सीएसआयआरचे माजी महासचिव डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी अभियंत्यांना केले.

ठळक मुद्देव्हीएनआयटीचा २० वा दीक्षांत समाराेह

नागपूर : भारताला विकासाच्या ‘स्टार्टअप’ची गरज आहे. मात्र, हे स्टार्टअप सर्वसमावेशक असावे, जेथे कुणीही मागे राहणार नाही. तरुण अभियंत्यांवर याची माेठी जबाबदारी आहे. त्यामुळे काम शांतपणे करा पण तुमच्या यशाचा आवाज हाेऊ द्या, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक आणि सीएसआयआरचे माजी महासचिव डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी तरुण अभियंत्यांना केले.

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (व्हीएनआयटी)चा २० वा दीक्षांत समाराेह गुरुवारी संस्थेच्या सभागृहात पार पडला. यावेळी देशाचे लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे हे आभासी माध्यमाद्वारे उपस्थित हाेते. व्हीएनआयटीचे प्राचार्य प्रा. प्रमाेद पडाेळे व अन्य मान्यवरही उपस्थित हाेते. यावेळी डाॅ. माशेलकर यांनी पदवीधर अभियंत्यांना यशाचे पाच मंत्र दिले. जन्म आणि सुरूवात आपल्या हाती नाही. पण कुठे शेवट करायचे, हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपले भविष्य कुठे घेऊन जायचे, याचा विचार करून पावले उचलण्याची गरज आहे. दुसरे म्हणजे यशस्वी हाेण्यासाठी कठीण परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. तिसरे म्हणजे दृढ विश्वास असायला हवा. साेडून देणारे जिंकत नाहीत व जिंकणारे साेडून देत नाहीत. त्यामुळे काम शांतपणे करा व यशाचा आवाज हाेऊ द्या. चाैथे म्हणजे समाधानाचा भाग व्हा, समस्येचा नाही आणि पाचवे म्हणजे यशाची काेणतीही मर्यादा नसते. आपल्या देशासाठी तुम्ही कार्य करत राहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसाठी तरुण अभियंत्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

अभिनव शिखरेला चार पदकांसह ८ पुरस्कार

समारंभादरम्यान व्हीएनआयटीच्या विविध विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाेत्तम सीजीपीए प्राप्त करून प्रथम क्रमांकावर आलेल्या अभिनव शिखरे या विद्यार्थ्याला ‘सर विश्वेश्वरय्या पदक’ प्रदान करण्यात आले. अभिनवने चार पदकांसह ८ पुरस्कार प्राप्त केले. बेसिक स्पष्ट आणि सातत्य असले की यश खेचून आणता येते, अशी भावना अभिनवने व्यक्त केली. सर्वाेच्च पदक प्राप्त करण्याचे ध्येय मनात बाळगले हाेते व त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास केल्याचे ताे म्हणाला. दाेन महिन्यांपूर्वी प्लेसमेंटमध्ये त्याला जाॅब मिळाला आहे. उद्याेगाचे काॅर्पाेरेट कल्चर अनुभवायचे आहे व स्वत:चा व्यवसाय उभा करायचा असल्याचे ध्येय त्याने व्यक्त केले.

समाराेहादरम्यान १३७५ पदवी प्रदान

समाराेहादरम्यान ७० डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी, ३७५ मास्टर ऑफ टेक्नाॅलाॅजी, ५६ मास्टर ऑफ सायन्स, ५५ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि विविध अभियांत्रिकी शाखांमधील ८१९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय व्हीएनआयटी विद्यार्थी व संशाेधन अभ्यासकांना ४७ पदके आणि गुणवंत शैक्षणिक कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र