शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची

By admin | Published: November 02, 2015 2:14 AM

धर्मसत्तेमध्ये नैतिकता पाळली जाते. राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची असते. देशातील सज्जन शक्तींनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस : मंगलनाथ महाराजांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळानागपूर : धर्मसत्तेमध्ये नैतिकता पाळली जाते. राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेची नैतिकता महत्त्वाची असते. देशातील सज्जन शक्तींनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. मंगलनाथ महाराज यापैकीच एक आहेत. त्यांचा भक्तसंप्रदाय मोठा आहे. त्यांना शंकराचार्यांचा आशीर्वाद लाभला आहे. ते शतायुषी होऊन समाजाला मार्गदर्शन करीत राहतील, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले. नाथ संप्रदायातील चित्रकूट गादीचे अधिपती सद्गुरुयोगेश्वरानंद डॉ. मंगलनाथ महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते. रोडी परिवारातर्फे लक्ष्मीनगरातील राणी लक्ष्मीबाई सभागृह परिसरात आयोजित या सोहळ्याला रविवारपासून सुरुवात झाली. याप्रसंगी फडणवीस यांच्या हस्ते मंगलनाथ महाराज यांचा नागरी सत्कार करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी महाराज, आचार्य गोविंददेव गिरी महाराज, लोणी येथील सखाराम महाराज संस्थानचे प्रमुख नाना महाराज, कांचन गडकरी व अंकुर सिडस्चे अध्यक्ष रवी काशिकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अतिशय मानाची अपेक्षा, सतत वाद घालणे, रागावणे, परिग्रह करणे, आत्मप्रशंसा व मित्रद्रोह या सहा गोष्टी मनुष्याचे आयुष्य कुडतडून टाकतात. यामुळे आपण शतायुषी असूनही पूर्ण आयुष्य उपभोगू शकत नाही, असे मार्गदर्शन शंकराचार्यांनी केले. वीणा पेंडके यांनी मानपत्राचे वाचन, रेणुका देशकर यांनी संचालन तर, दिलीप रोडी यांनी आभार व्यक्त केले.(प्रतिनिधी)धार्मिकतेवरून देशात गैरसमज - गडकरीभारतीय जीवनमूल्ये, विचार व हिंदू धर्म जगात सर्वश्रेष्ठ आहे. परंतु, गेल्या काही काळापासून धार्मिकता व जातीवादावरून समाजामध्ये गैरसमज पसरविण्यात येत आहे. यातून संघर्ष निर्माण होत आहे. त्याचा राजकीय उपयोग केला जातोय, अशी खंत नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. साधूसंतांच्या संस्कारामुळे हिंदू संस्कृतीने जगात वेगळा ठसा उमटविला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे प्रगती होते पण, जीवन घडविण्याचे काम संस्कृती करीत असते. असे असले तरी आपल्याला स्वत:च्या देशात यावरून टीका सहन करावी लागत आहे. समाजाला भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. आज सोशल मीडियाचा वापर करून भारतीय जीवनमूल्ये रुजविण्याची गरज आहे. मंगलनाथ महाराज यांनी धार्मिक, व्यसनमुक्ती, प्रबोधन इत्यादी क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांनी अनेक शिष्यांना दृष्टी दिली आहे. योग्य दृष्टी असल्याशिवाय समाजात परिवर्तन होऊ शकत नाही असेही गडकरी यांनी सांगितले.