- संजय शर्मानवी दिल्ली : येत्या दोन महिन्यांत रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील प्रत्येक गाव आणि शहरात अयोध्या अवतरण्यासाठी काम करतील. देशातील १० कोटी जनतेला अयोध्येला जाण्यासाठी आमंत्रित केले जाईल. फेब्रुवारी २०२४ मध्ये एकट्या महाराष्ट्रातील २० हजारांहून अधिक प्रमुख लोक अयोध्येला भेट देतील. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण देशात ‘राममय’ वातावरण होईल.
४ हजार संतांना निमंत्रणमहंत नृत्य गोपालदासजी, बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह देशातील चार हजारांहून अधिक साधू-संतांना निमंत्रण पाठविले जात आहे.