शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

९७५ बालकांची तस्करांच्या तावडीतून सुटका

By admin | Published: December 04, 2014 12:47 AM

मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या ९७५ बालकांची सुटका करण्यात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे यश आले आहे.

नवी दिल्ली : मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या ९७५ बालकांची सुटका करण्यात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे यश आले आहे. या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडे पाठपुरावाही केला जात आहे. दिल्ली, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकांवर ही कारवाई मागील साडेतीन वर्षांत झाली. यंदाच्या मार्च महिन्यात दिल्ली रेल्वेस्थानकावर ४४५ बालकांची सुटका केल्याने हा विषय पुन्हा प्रकाशात आला. २०११ पासून आतापर्यंत ९० घटनांमध्ये एकट्या दिल्ली पोलिसांना ४४५ बालकांना वाचविण्यात यश आले व २९० आरोपींना अटक करण्यात आली. दिल्ली रेल्वेस्थानकात झालेल्या बचाव अभियानातून मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या बालकांना वाचविण्यात पोलिसांना यश आले होते. त्यावरून देशभरात बालके याकामी नेणाऱ्यांच्या टोळ््या किती आहेत, पोलीस व राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने कोणती पावले उचलली, या खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी उत्तर दिले. चौधरी म्हणाले, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे साडेतीन वर्षांत ६४ तक्रारी दाखल झाल्या असून ५५ प्रकरणांच्या सुनावण्या झाल्या आहेत. नऊ प्रकरणांच्या सुनावण्या सुरू आहेत. झारखंड, बिहार, प. बंगाल व केरळात मानवी तस्करीसाठी या बालकांचा वापर होणार होता. आयोगाने केलेले प्रयत्न व पोलिसांचे अभियान याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)