शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

'हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील'; अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर योगी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 10:37 PM

मुख्यमंत्री योगी म्हणाले, 1990 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले.

जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांचे नुकसान होते. जर हिंदूचे घर जाळाले तर मुस्लिमाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल तर मुस्लिमही सुरक्षित असेल. जर हिंदूचे घर सुरक्षित असेल तर मुस्लिमाचे घरही सुरक्षित राहील. आम्ही पाच वर्षांत एकही दंगल होऊ दिली नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 1990 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले. केवळ 1990 मध्येच नाही तर त्यानंतरही समाजवादी पक्षाला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा तेव्हा कोणालाही सुरक्षित वाटत नव्हते. सपा सरकारच्या काळात राज्य दंगलीच्या आगीत जळत होते. आज आपण म्हणून शकतो, की आम्ही राज्य दंगलमुक्त केले.

अयोध्या-काशीनंतर मथुरेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री योगी म्हणाले, भूतकाळातील वैभवाची पुनर्स्थापना करण्याची मोहीम चालवली जात आहे. आपल्याला भारत आणि भारतीयत्वाचा अभिमान वाटावा, याचा हा भाग आहे. आम्ही मथुराही बनवू. ज्यांच्यामध्ये दम असेल, तेच मथुरा बनवतील, असे योगी म्हणाले. 

योगी म्हणाले, काही लोक म्हणत होते, की निकाल आला तर रक्ताच्या नाद्या वाहतील. त्यांनी पाहिले आहे, की आम्ही कशा पद्धतीने भव्य राम मंदिर उभारण्याच्या दिशेने अग्रेसर झालो आहोत. राष्ट्रवाद हा आमचा अजेंडा आहे. राम मंदिर हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा भाग आहे. विश्वनाथ धाम आणि कुंभ हेही त्यचाच भाग आहेत. पवित्र भूमी भव्य-दिव्य बनविणे हा आमच्या राष्ट्रवादाचा भाग आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाAyodhyaअयोध्या