शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भाजपा आणि मोदी सरकार दोघेही ‘दुतोंडी’

By admin | Published: December 02, 2014 4:46 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे दुतोंडी पक्षाचे सरकार आहे. भाजपा विरोधी पक्षात असताना एक बोलते आणि सत्तेत आल्यावर त्याच्या अगदी उलट बोलते. भाजपाच्या उक्ती आणि कृतीत मोठा विरोधाभास आहे. खऱ्या अर्थाने हे ‘यू टर्न’ सरकार आहे, असा घणाघाती आरोप करीत काँग्रेसने सोमवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी ‘सहा महिने पार, यू टर्न सरकार’ मथळ्याखाली एक पुस्तिका प्रकाशित करून भाजपा आणि मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मोदी आणि त्यांच्या सरकारने सत्तेत आल्यापासून ज्या मुद्द्यांवर घूमजाव केलेले आहे, असे एकूण २२ मुद्दे या पुस्तिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. मागच्या तीन दिवसांतच असे तीन मुद्दे पुढे आले आहेत, की ज्यावर मोदी आणि त्यांच्या पक्षाने आपली जुनी भूमिका बदलून घूमजाव केले आहे आणि काँग्रेसप्रणीत संपुआ सरकार जे काही सांगत होते, तेच आता मोदी सरकार सांगत आहे. कॅग, रेल्वे भाडेवाढ, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांपासून संसदेला मुक्त करणे आदी मुद्द्यांवर मोदींनी देशाला मोठमोठे उपदेश दिले आहेत, पण आज परिस्थिती कशी आहे? शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नाही. मोदी सरकारमध्ये गंभीर फौजदारी गुन्हे दाखल असलेले आणि गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल असलेले २१ मंत्री आहेत. हे यू टर्न नाही तर काय आहे, असा सवाल माकन यांनी केला. मोदी, त्यांचे मंत्री आणि भाजपा केवळ खोटे बोलून सत्तेत आल्याचा आरोप माकन यांनी या वेळी केला. दिल्लीत निवडणुका जवळ असल्यानेच मोदी सरकारने १९८४च्या दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे, असा आरोप त्यांनी केला.>विविध मुद्द्यांवर भाजपा व मोदी यांनी व्यक्त केलेले मत आणि कालांतराने त्याच मुद्द्यांवर त्यांनी कसे घूमजाव केले, हे सांगणारे प्रसंग काँग्रेसने पुस्तिकेत दिले आहेत.