शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

वर्चस्व गाजवूनही मुंबईचा इराणी चषकात शेष भारताकडून पराभव

By admin | Published: March 10, 2016 6:05 PM

इराणी चषक स्पर्धेत पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही मुंबईला शेष भारताकडून पराभवाची नामुष्की सहन करावी लागली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - इराणी चषक स्पर्धेत पहिल्या तीन दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवूनही मुंबईला शेष भारताकडून पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. मुंबईने विजयासाठी ठेवलेले ४८० धावांचे लक्ष्य शेष भारताने चार गडी राखून आरामात पार केले. 
पहिल्या डावात मुंबईने ६०३ धावांचा डोंगर उभारल्यानंतर शेष भारताचा पहिला डाव ३०६ धावात आटोपला होता. मुंबईकडे २९७ धावांची आघाडी होती. पण दुस-या डावात मुंबईचा डाव शेष भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर १८२ धावात आटोपला. पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर मुंबईने शेष भारतासमोर ४८० धावांचे लक्ष्य ठेवले होते. 
चौथ्या दिवशी शेष भारताने एक विकेटच्या मोबदल्यात १०० धावा करुन भक्कम सुरुवात केली होती. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शेष भारताला ३८० धावा करायच्या होत्या. सलामीवीर फझलचे शानदार शतक (१२७) धावा, करुण नायरची (९२) धावांची खेळी, स्टुअर्ट बिन्नीच्या (५४) आणि जॅक्सनच्या नाबाद (५९) धावांच्या बळावर शेष भारताने आरामात लक्ष्य पार करुन इराणी चषक जिंकला.