शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

हंगाम संपल्यानंतरही पीक कर्ज वाटप निम्म्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:19 AM

खरीप हंगामातील या वर्षीची पिके बहरात असतानाही कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे ...

खरीप हंगामातील या वर्षीची पिके बहरात असतानाही कर्ज वाटपाची गती मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात २०२१- २२ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १,२१३ कोटी २२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील खासगी, व्यावसायिक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ९४ हजार ६६४ शेतकऱ्यांना ६२८ कोटी ७२ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करत ५१ टक्के पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा आर्थिक कोंडीत सापडला आहे. यावर्षीचा खरीप हंगाम संपल्यानंतरही शेतकऱ्याला पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकेच्या दारात खेटे मारावे लागत आहेत. याकडे ना लोकप्रतिनिधीचे लक्ष, ना प्रशासनाचे! त्यामुळे बळीराजा पीक कर्ज मिळवताना जिल्ह्यात मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीयीकृत पाच बँका २० टक्क्यांच्या खाली

परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक बँकांना जिल्हा प्रशासनाने ७८१ कोटी ५८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी ९ सप्टेंबरपर्यंत या बँकांनी २५ हजार ८३४ शेतकऱ्यांना २५३ कोटी १७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत केवळ ३२ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे १०१ कोटी १८ लाख रुपयांचे खासगी बँकांना पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असतानाही या बँकांनी केवळ १,६९४ शेतकऱ्यांना २० कोटी ९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. या बँकांनी केवळ १९ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २३ हजार ६१५ शेतकऱ्यांना १९८ कोटी ९१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत १०६ पीककर्जाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत ४३ हजार ५२१ शेतकऱ्यांना १५६ कोटी २८ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करत कर्ज वाटपाचे १०९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीयीकृत ५ बँका २० टक्क्यांच्या खाली असल्याचे दिसून येत आहे.

संघटना, पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प

यावर्षीचा खरीप हंगाम संपल्यानंतरही केवळ ९४ हजार ६६४ शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बँकांनी ६२८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. विशेष म्हणजे दीड लाखांहून अधिक शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. बँकांकडून पुनर्गठन, कर्जमाफी, सिबिल यांसह अनेक कारणे देऊन पीक कर्ज नाकारत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत, असे असतानाही जिल्ह्यातील संघटना, राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र आवाज उठवताना दिसत नाहीत.