Join us  

खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने बोलावले; अमोल कीर्तिकरांनी केली होती याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 4:20 PM

1 / 8
एनडीएच्या खासदाराचा अल्प मतांनी विजय हा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना खासदार रवींद्र वायकर आहेत.
2 / 8
लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या वायव्य मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजय मिळवून खासदार झालेल्या रवींद्र वायकर यांना उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे.
3 / 8
ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यामुळे खासदार रवींद्र वायकर अडचणीत आले आहेत. वायकर यांचा बाजूने दिलेला निकाल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कीर्तिकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.
4 / 8
न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कीर्तीकर यांनी त्यांच्या याचिकेत केलेल्या दाव्यांचे उत्तर देण्यासाठी वायकर आणि इतर प्रतिवादींना २ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहावे लागेल, असे खंडपीठाने म्हटलं आहे.
5 / 8
अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कामात त्रुटी असल्याचा आरोप केला होता. मतांच्या पुन्हा मोजणी करण्यासाठी अर्ज दाखल करू दिला नाही असा आरोप कीर्तिकर यांनी केला होता.
6 / 8
कार्तिकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्यांच्या मतमोजणी एजंटांना वैधानिक आवश्यकता असूनही त्यांना रिटर्निंग ऑफिसरच्या टेबलावर बसू दिले गेले नाही.
7 / 8
कार्तिकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्यांच्या मतमोजणी एजंटांना वैधानिक आवश्यकता असूनही त्यांना रिटर्निंग ऑफिसरच्या टेबलावर बसू दिले गेले नाही.
8 / 8
अमोल कीर्तिकर यांनी वायकर यांची निवडणूक रद्दबातल ठरवण्यासाठी आणि याचिकाकर्त्याला १८व्या लोकसभेवर रीतसर निवडून आल्याचे घोषित करण्याचे निर्देश कोर्टाकडे मागितले आहेत.
टॅग्स :lok sabhaलोकसभाamol kirtikarअमोल कीर्तिकरRavindra Waikarरवींद्र वायकरHigh Courtउच्च न्यायालय