By मोरेश्वर येरम | Updated: January 25, 2021 13:01 IST
1 / 10मुंबईत आज जवळपास १२ हजार शेतकरी पायपीट करत आझाद मैदानात दाखल झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांना विरोध आणि विविध मागण्यांसाठी हे शेतकरी व कष्टकरी आंदोलन करतायत. पण या आंदोलनाला कोरोनाचीही पार्श्वभूमी आहे हेही लक्षात घ्यायला हवं. (छायाचित्र: दत्तात्रय खेडेकर)2 / 10कोरोना सावटाखाली इतक्या मोठ्या मोर्चाला सांभाळणं हे काही सोपं काम नव्हतं. आझाद मैदानात ठिकठिकाणी शेतकरी मोर्चेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. 3 / 10शेकडो किलोमीटर रस्ता पायी तुडवत मुंबईत दाखल झालेल्या सर्व कष्टकरी आणि शेतकऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.4 / 10आपल्या पारंपारीक कलांच्या माध्यमातून शेतकरी महिला मोर्चात सहभागी झाल्या आहेत.5 / 10राज्याच्या आदिवासी बहुल भागातून हे कष्टकरी मुंबईत पायी दाखल झालेत.6 / 10कोरोनाच्या महामारीत इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होण्याबाबत विचारलं असता कोरोनानं नव्हे, तर नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा जीव जाईल, असं सांगत कायद्यांना विरोध दर्शवला. 7 / 10थंडी, वाऱ्याची पर्वा न करता हे कष्टकरी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.8 / 10आंदोलन ठिकाणी कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी स्वत: मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आझाद मैदानात उपस्थित आहेत.9 / 10नाशिक, धुळे, नंदुरबार अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत.10 / 10आझाद मैदानातून हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार असल्याचं किसान सभेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पण पोलिसांकडून यासाठी परवानगी देण्यात आलेली नसल्याचं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.