शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

वितरिकांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Published: May 11, 2017 4:19 AM

नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत. या भागातील विहिरी व विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील शेतपिके व जनावरांचा ओला चारा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्र. ४२ व ४३ यांना पाणी सोडण्याची मागणी होत आहे. इंदापूरच्या पश्चिम भागातील वितरिकांना नीरा डावा कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.सध्या नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. आर्वतन सुरू होऊन ५० दिवस उलटले, तरीदेखील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका क्र. ४२ व ४३ ला पाणी सोडले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलच या भागातील विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. नीरा डावा कालव्यावरील विनापरवाना सायफन जोरात सुरू असल्याने बड्या धेंडांची चलती होत आहे. तर, छोटे शेतकरी मात्र पाण्याची वाट पाहत आहेत. या भागात कालव्यावर अनधिकृत सायफनचे मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. त्यामुळे पाणी कमी दाबाने मिळत असल्याने शेतीचे भरणे होत नाही. याचा फटका मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर मोहीम राबवून अनधिकृत सायफनधारकावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत. या भागात राजकीय पुढाऱ्यांचीदेखील अनधिकृत सायफन असल्याने त्याच्यावर कारवाई करताना अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, या वर्षी उष्णतेची दाहकता जास्त आहे. इंदापूरच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने आपल्याला पिण्यासाठी पाणी सोडावे लागले. तसेच, या वर्षी उष्णतेमुळे पाण्याचे बष्पीभवन आणि शेतातदेखील पाणी जास्त द्यावे लागत आहे. या वितरिकांना पाणी सोडण्यास विलंब होत आहे. १४ तारखेला या वितरिकांना पाणी सोडू, असे त्यांनी सांगितले.