पावसाळ्यात केसांना कसं सुरक्षित ठेवावं हा मोठाच प्रश्न असतो. कधी कामानिमित्तानं बाहेर असताना नाईलाजनं केस ओले होतात तर कधी मुद्दाम ठरवून पावसात भिजलं की केस ओले होतात. पावसाळ्याच्या दिवसात घरात असा किंवा बाहेर दमट वातावरणामुळे केस तेलकट आणि चिपकू चिपकू होतात. केसातला ओलेपणा नीट घालवला नाही तर खाज, कोंडा यासारख्या समस्याही निर्माण होतात. केस मोकळे सोडले तरी मोहक दिसत नाहीत आणि बांधून ठेवले तरी नकोसे वाटतात. या समस्यांवर उपाय म्हणून अनेकजणी शाम्पू- कंडीशनर यांच्यावर भरवसा ठेवून त्यांचा उपयोग करुन पाहतात पण पावसाळ्यातील केसांच्या समस्यांवर मात्र नेमकं उत्तर सापडत नाहीच.पावसाळ्यात केस जपण्यासाठी बाजारातले शाम्पू कंडिशनर कामी येत नाही तर फार पूर्वीपासून सांगून ठेवलेल्या आणि अवलंबलेल्या घरगुती उपायांचाच उपयोग होतो असं स्टार आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणतात. पावसाळ्यात केसांचं आरोग्य जपण्यासाठी आणि दमट वातावरणातही केस मऊ सुळसुळीत ठेवण्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी एक तेल सूचवलं आहे. वाळा, तुळस आणि गुंजाचं बी यांचा समावेश असलेलं हे तेल पावसाळ्यातल्या केसांच्या समस्यांवर जुना घरगुती इलाज आहे.समाज माध्यमांवर पावसाळ्यातील केसांच्या समस्यांवर एक पोस्ट लिहून या समस्या सोडवण्यासाठी घरच्या घरी तेल कसं करता येईल त्याची कृतीही त्यांनी या पोस्टमधून सांगितली आहे.
ऋजुता दिवेकर सांगतेय पावसाळ्यात केसांना लावावं असं वाळ्या-तुळशीचं तेल, असं बनवा घरच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 15:52 IST
पावसाळ्यात केसांचं आरोग्य जपण्यासाठी आणि दमट वातावरणातही केस मऊ सुळसुळीत ठेवण्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी एक तेल सूचवलं आहे. वाळा, तुळस आणि गुंजाचं बी यांचा समावेश असलेलं हे तेल पावसाळ्यातल्या केसांच्या समस्यांवर जुना घरगुती इलाज आहे.
ऋजुता दिवेकर सांगतेय पावसाळ्यात केसांना लावावं असं वाळ्या-तुळशीचं तेल, असं बनवा घरच्या घरी
ठळक मुद्देवाळ्याची मुळं हे जीवाणू विरोधक असतात. वाळ्याच्या वापरानं केस पुर्नज्जीवित होतात.तुळशीच्या मंजुळा केसांच्या मुळांचा रक्तप्रवाह सुधारतात.गुंजाच्या बिया हे केस गळती थांबवतात.