Join us   

आंबे पाण्यात भिजवूनच का खायचे? आंबा खाण्याने खरेच पिंपल्स आणि वजनवाढीचा त्रास होतो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2023 1:06 PM

Why mangoes should be soaked in water before consuming आंबे खाऊन तब्येत बिघडते कारण.. आंबा खाताना होणारी चूक..

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश करणे आवश्यक. सिझननुसार फळ आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पौष्टीक  घटक मिळतात. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा अवयवांना मिळते. सिझनला मिळणारे सगळे फळ, भाज्या खाण्याचा सल्ला अनेक जण देतात. सध्या उन्हाळा सुरु आहे.

उन्हाळ्यात आंबा मोठ्या प्रमाणावर मिळतात. आंब्याला फळांचा राजा देखील म्हणतात. आंबा खाण्याचे शौकीन संपूर्ण महाराष्ट्रात सापडतील. पण आंबा आवडतो म्हणून जास्त खाऊ नका. आंबा अधिक खाल्ल्याने देखील आरोग्यावर दुष्परिणाम होतात. ज्यामुळे हाडं ढिसूळ होण्याची शक्यता वाढते.

यासंदर्भात, पोषणतज्ञ किरण कुकरेजा सांगतात, ''आंब्याच्या आत फायटिक अॅसिड असते. हे घटक शरीरासाठी फायदेशीर पण आहे, व तितकेच हानिकारक देखील आहे. आंब्याव्यतिरिक्त अनेक बिया व धान्यांमध्ये हे आढळते. याच्या अतिरिक्त सेवनाने शरीरात ३ गोष्टींची कमतरता भासू शकते''((Why mangoes should be soaked in water before consuming).).

आंबा खाण्याची योग्य पद्धत

पोषणतज्ञांच्या मते, आंबे खाण्यापूर्वी किमान १ तास पाण्यात भिजवले पाहिजेत. जेव्हा आपण आंबा पाण्यात भिजवतो, तेव्हा फायटिक ऍसिड कमी होते, व शरीरात होणाऱ्या संभाव्य नुकसानांपासूनही संरक्षण होते.

रसाळ आंब्याचा सिझन आला, पण आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे की केमिकल घालून, कसे ओळखाल?

या आजारांपासून करेल सरंक्षण

एनसीबीआयच्या संशोधानुसार, फायटिक ऍसिड शरीरात गेल्यानंतर लोह, जस्त आणि कॅल्शियम इत्यादींचे शोषण कमी करते. ज्यामुळे शरीराला हे घटक मिळत नाही. अशा स्थितीत अशक्तपणा, कमकुवत हाडे आणि झिंकची कमतरता होऊ शकते.

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

भिजवलेले आंबे खाल्ल्याने वाढणार नाही उष्णता

काही लोकांचे शरीराचे तापमान जास्त असते. थोडासा आंबा खाल्ल्यानंतरही पिंपल्स, अॅलर्जी, स्किन इन्फेक्शन ही समस्य उद्भवू लागते. पोषणतज्ञांच्या मते, भिजवलेले आंबे खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढत नाही.

दह्यात मीठ घालून खावे की साखर? तज्ज्ञ सांगतात काय फायद्याचं - कशाने बिघडते तब्येत

फायटिक ऍसिड ठरते फायदेशीर

काही संशोधनात असे आढळून आले की, फायटिक ऍसिड संतुलित मात्रामध्ये अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. ज्यामुळे इन्शुलिन रेजिस्टेंसपासून बचाव होतो व मधुमेहाचा धोका काही प्रमाणात टाळता येतो.

टॅग्स : आंबासमर स्पेशलहेल्थ टिप्स