Join us  

शाबास पोरी! वडिलांच्या मृत्यनंतर लेकीनं सांभाळली शेती; मशरुमच्या शेतीनं पालटले दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 3:12 PM

Woman Farmer :  मशरूमपासून बनवलेले 10 ते 15 हेल्दी खाखरे 50 रुपयांना विकले जातात.  पुष्पा यांना कृषी केंद्रातूनच खाखरा बनवण्याची कल्पना सुचली. 

(Image Credit- Thebetterindia.com)

लग्नानंतर स्वावलंबी होण्यासाठी एका महिलेनं आई-वडिलांच्या पाच बिघा जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील अमलसाड येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय पुष्पा पटेल २०१३ पासून शेती करत आहे. पुष्पा यांनी लग्नापूर्वी  कधीही शेती केली नव्हती. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जमिनीचा योग्य उपयोग व्हावा म्हणून त्यांनी शेती केली. कृषी विद्यापीठातून योग्य तंत्र शिकून त्यांनी चिकू आणि काही हंगामी भाज्याही पिकवल्या.

बेटर इंडियाशी बोलताना पुष्पा यांनी सांगितलं की, ''माझा भाऊ परदेशात असतो. वडिलांच्या मृत्यूनंतर आईसोबत मी शेती करायला सुरूवात केली. यामुळे माझी मिळकत वाढवण्यास मदत झाली.''  काही वर्षांनी पुष्पा यांची मिळकत इतकी वाढली की त्यांनी नवनवीन प्रयोग करायला सुरूवात केली. गेल्या २ वर्षांपासून  आईच्या निधनानंतर पुष्पा एकटीच शेतीचं सगळं काम सांभाळत आहे. 

पुष्पा यांना शेतीत नवीन काहीतरी करायचे होते. कृषी विद्यापीठातूनच त्यांनी मशरूम शेती आणि त्याचे फायदे जाणून घेतले. त्या काळात त्याच्या आजूबाजूच्या गावात कोणीही मशरूम उगवत नव्हते पण त्यांनी आणखी एकदा प्रयत्न करायचे ठरवले. त्यांच्या घरात एक खोली होती, जिथे शेतातील साहित्य ठेवले  जायचे. तिने ऑयस्टर मशरूम वाढवायचे ठरवले होते.

सुरुवातीला त्यांनी जवळपासच्या लोकांना आणि नातेवाईकांना मोफत मशरूम दिले. गावात कोणालाच मशरूम खायला किंवा विकत घ्यायला आवडत नसे. मशरूमच्या लागवडीतही त्यांचे सुरुवातीला नुकसान झाले होते. पण सुमारे एक वर्षानंतर, त्याला कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या जत्रेत मशरूम विकण्यासाठी बाजार सापडला. यानंतर त्यांना चांगला नफा मिळू लागला आणि त्यानंतर त्यांनी मशरूमची व्यावसायिक लागवड करण्यास सुरुवात केली. पुष्पा यांनी शेतीसाठी 15,000 रुपयांची सुरुवातीची गुंतवणूक केली होती, जी महिन्याभरात वसूल झाली.

केस खूप गळताहेत, टक्कल पडण्याची भिती वाटते? ४ उपाय दाट, मजबूत केस राहतील कायम

त्या सांगतात की, ''खर्चापेक्षा नफा खूप जास्त आहे, मी ऑयस्टर मशरूमचे बियाणे सुमारे 130 रुपये प्रति किलो या दराने आणतो, जे 10 ते 12 पिशव्या शेतात लावते आणि मशरूम वाढवते. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे अवघ्या १५ दिवसांत मशरूम तयार होतात. अशाप्रकारे एक किलो बियाण्यापासून प्रथमच 10 किलो उत्पादन मिळते.''

जेव्हा मशरूमची विक्री होत नाही तेव्हा काय करतात?

जेव्हा ताज्या मशरूमची विक्री होत नाही तेव्हा त्या वाळवून पावडर बनवतात आणि नंतर खाखरे वगैरे बनवून विकतात.  खाखरा बनवण्यासाठी त्यात गव्हाचे पीठ, मशरूम पावडर आणि इतर मसाले मिसळतात.  सामान्य पीठ अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात मशरूमचे पीठ टाकले जाते.  मशरूमपासून बनवलेले 10 ते 15 हेल्दी खाखरे 50 रुपयांना विकले जातात.  पुष्पा यांना कृषी केंद्रातूनच खाखरा बनवण्याची कल्पना सुचली. 

 शेतीत केलेल्या या नवनवीन प्रयोगांमुळे त्यांचे उत्पन्न तीन ते चार लाखांनी वाढले. त्या सांगतात, "आज या आर्थिक स्वावलंबनामुळे मी माझ्या मुलांना गावाबाहेर शहरात शिकायला पाठवले आहे." पुष्पा यांची मुलगी  बी.टेकचे शिक्षण घेत आहे. त्यांचा मुलगा गुजरातमधील अरवली येथे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीबागकाम टिप्स