Join us  

लहानपणीच मुलांना शिकवा ‘ही’ १ गोष्ट; मुलांच्या आत्महत्या टाळायच्या तर, विकास दिव्यकिर्ती सांगतात,...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 5:41 PM

Parenting Advice Given By Vikas Divyakirti :

मुलांचे पालनपोषण करणं ही आईवडीलांची सगळ्यात मोठी जबाबदारी असते. (Parenting Tips) मुलांनी  याबाबत विचार केला नाही त्यांना चुकीचे परिणाम भोगावे लागू शकतात. एक्सपर्ट्स आपल्या मुलांच्या पालन पोषणासाठी त्यांना नेहमीच चांगले संस्कार देत असतात. (Parenting Tips And Hacks) आयएएसचे संस्थापक आणि डायरेक्टर विकास दिव्यकिर्ती यांनी आपल्या एका स्पीचमध्ये पालकांना खास सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की आई वडीलांनी आपल्या मुलांना नक्कीच शिकवायला हवे. जर तुम्हीसुद्धा एक पालक असाल तर विकास  दिव्यकिर्तींचा हा सल्ला तुमच्यासाठी बराच फायदेशीर ठरेल. पॅरेंट्सनी आपल्या मुलांना काही गोष्टी वेळीच काही गोष्टी शिकवायला हव्यात.  (Teach These 5 Things To Child Advice By Vikas Divyakirti)

लोकांना भिती वाटते

विकास दिव्यकिर्ती सांगतात की आयुष्यात अशा  ३ लोकांना ओळखतो ज्यांनी देशाच्या सगळ्यात मोठ्या संस्थानांमध्ये नोकरी केली आणि आयएएस आणिआयपीएस बनले. त्यांनी जॉब करत संपूर्ण जीवन संपवले आणि ते घर आणि कुटूंबाच्या जबाबदाऱ्या मॅनेज करू शकत नव्हते. विकास यांनी सांगितले की लोक आपल्या आयुष्यातील दु:ख  झेलू शकत नाहीत  ना विसरू शकत  या नादात ते आपलं जीवनचक्रच खराब करत आहेत लोकांची आपल्या समस्या टाळण्यासाठी  लेट गो म्हणणं टाळायला हवं. 

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

मुलांनी काय शिकवायला हवं

विकास सांगतात  मुलांना त्यांच्या अभ्यासातील काही खास विषय हिस्ट्री, मॅथ्स, इकोनोमिक्स हे विषय शिकवायला हवेत.   यामुळे तुम्ही कोणतीही गोष्टी शिकू शकत नाहीत. मुलांच्या इमोशंन्स समजून घ्या आणि ते डिल करायला शिका.

सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती

जेव्हा असं वाटेल की सगळं काही संपलंय तेव्हा दीर्घश्वास घ्या आणि त्या वातावरणातून स्वत:ला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.  हे मुलांना यशस्वी होण्यासाठी फार महत्वाचे आहे.

आपल्या भावनावंर नियंत्रण ठेवा

विकास दिव्यकिर्ती यांच्यामते व्यक्तीने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून त्यावर कंट्रोल करायला शिकायला हवं. ज्यामुळे त्यांच्यात मॅच्युरिटी येते आणि कोणतंही चुकीचं पाऊल उचलण्याआधी मुलं स्वत:ला सांभाळतात. मुलांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं.  ज्यामुळे ते कधीच चुकीचं पाऊल उचलणार नाहीत.

टॅग्स :पालकत्व