Join us   

जरा उन्हात गेलं की चेहरा काळा पडतो? आंघोळीनंतर ‘हा’ पदार्थ चेहऱ्याला लावा, चेहऱ्यावर येईल तेज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 6:02 PM

1 / 7
ऊन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची खास काळजी घेणं गरजेचं असतं. अन्यथा टॅनिंग, रॅशेज, खाज येणं अशा त्वचेच्या वेगवेवगळ्या समस्या उद्भवतात. या वातावरणात त्वचेची खास काळजी घेण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं असतं. ज्यामुळे त्चवा हायड्रेट राहते. अंघोळीनंतर काही पदार्थ चेहऱ्याला लावले तर टॅनिंग होत नाही आणि चेहरा ताजातवाना दिसतो
2 / 7
एलोवेरा आपल्या त्वचेसाठी फार महत्वाचा आहे. एलोवेरामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. स्किनच्या समस्या टाळण्यासाठी क्रिम किंवा पावडरचा वापर करा. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग दिसत नाहीत. अंघोळीनंतर हे जेल चेहऱ्याला लावल्यास चमकदार त्वचा दिसते.
3 / 7
त्वचेवर टोनर लावणं खूप महत्वाचे आहे. नियमित टोनर लावल्याने त्वचेचं सौंदर्य टिकून राहण्यासमदत होते आणि चेहरा ग्लो करतो.
4 / 7
सनस्क्रीन लावल्याने सुर्याच्या हानीकारक किरणांपासून बचाव होतो. चेहऱ्याला सनस्क्रीन लाववल्याने उन्हापासून बचाव होतो याशिवाय त्वचा ग्लोईंग आणि मॉईश्चराईज दिसते.
5 / 7
अंघोळीनंतर मॉईश्चराईज लावल्यानंतर सिरम लावायला हवं. चेहरा दिवसभर हायड्रेट राहतो. त्वचेची रोमछिद्र ओपन होतात आणि स्किन चमकदार दिसून येते.
6 / 7
ऊन्हात बाहेर जाताना संपूर्ण चेहरा झाकला जाईल याची काळजी घ्या. कारण सुर्याच्या हानीकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.
7 / 7
टॅनिंग काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेवर स्क्रबिंग करा आणि चेहरा स्वच्छ धुवा.
टॅग्स : त्वचेची काळजीब्यूटी टिप्स