By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 19:14 IST
1 / 8भारतीय संस्कृतीत टिकलीला फार महत्व आहे. (Wearing Bindi Can Reduce Stress) खासकरून विवाहीत स्त्रिया आवर्जून टिकली लावतात. टिकली, बांगड्या, पैंजण यांमुळे महिलांच्या सौंदर्यात भर पडते. (Bindi Can Reduce Stress Stress Removal Tips)2 / 8परंपरेनुसार अलंकार वापरण्याचे काही महत्त्व आहे. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.3 / 8काहीजण असं मानतात की, महिला कपाळावर आपण ज्या ठिकाणी टिकली लावली जाते त्या भागाला अजना चक्र म्हटलं जातं.4 / 8हे आपल्या शरीरातले सहावे आणि शक्तीशाली चक्र असते असे मानले जाते.5 / 8महिलांनी कपाळावर टिकली लावली तर त्याचे काही फायदे आहे असं म्हणतात. त्याबाबत शास्त्रीय माहिती मात्र उपलब्ध नाही.6 / 8टिकली लावल्याने महिलांचे सौंदर्य मात्र वाढते. गंध लावणे, मेण लावून त्यावर सुरेख कुंकू कोरणे ते गंध लावणे ते आता विविध रंगाच्या टिकल्या असा टिकलीचा सुंदर प्रवास झाला आहे.7 / 8काहीजण असं मानतात की टिकली किंवा गंध लावल्याने एकाग्रता वाढते आणि डोकेदुखी कमी होते.8 / 8बाकी काहीही असो, सणावाराच्या दिवसात अनेकजणी सुंदर टिकल्या लावतात. आपल्या चेहऱ्याला शोभेल अशा या टिकल्या सौंदर्य खुलवतात.