1 / 8उन्हाळ्यात बाजारात आपल्याला अनेक रंगबेरंगी फेळे पाहायला मिळतात. फळात असणारे घटक हे शरीराला योग्य पोषण देतात. या फळांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे डिहायड्रेशनच्या समस्येपासून आपली मदत होते. (Overeating fruits and digestive issues)2 / 8उन्हाळ्यात ही फळे खाल्ल्याने आरोग्याला जितका फायदा होतो तितकेच नुकसान देखील होते. या ऋतुमध्ये काही फळे अशी आहेत ज्यांचे जास्त सेवन केल्याने आपल्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होते. (Fruits that cause gut health problems)3 / 8उन्हाळ्यात तोंडाला चव येण्यासाठी लिची हे फळ फायदेशीर मानले जाते. परंतु, जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. 4 / 8अननस जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात आम्लता आणि जळजळ होण्याची समस्या वाढते. 5 / 8कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचे स्त्रोत आहे. यामुळे डिहायड्रेशनच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होते. हे जास्त प्रमाणात खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवू शकते. 6 / 8उन्हाळ्यात खरबूज शरीराला थंडावा देत नाही तर जिभेला चव देखील आणते. यामुळे आपण अधिक प्रमाणात खातो. ज्यामुळे पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या वाढतात. 7 / 8उन्हाळा म्हटलं की, आपण आंबे आवडीने खातो. परंतु आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला हानिकारक ठरतो. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असू तर हा कमी प्रमाणात खायला हवा. आंब्यामध्ये जास्त प्रमाणात साखर आणि कार्बोहायड्रेट्स असल्याने साखरेची पातळी वाढू शकते. 8 / 8पपई खाल्ल्याने पचनसंस्था सुरळीत होते पण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाऊ नका. पपई उष्ण असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढवते. ज्यामुळे अतिसाराची समस्या उद्भवते.