1 / 6वारंवार बाजारात जाऊन आणायला नको म्हणून आपण डाळ, तांदूळ एकदाच घेऊन साठवून ठेवतो. पण त्याचा नेमका उलटाच परिणाम होतो आणि डाळींना भुंगा लागतो तर तांदळात किडे, अळ्या होऊ लागतात.2 / 6असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं आणि कोणत्या डाळीमध्ये कोणते पदार्थ घालून ठेवायचे, याविषयीची माहिती आता पाहूया.. ही माहिती homestylebysheela या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.3 / 6यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तांदळात किडे होऊ नये म्हणून तांदळाच्या बरणीमध्ये तेजपान घालून ठेवावे.4 / 6हरबऱ्याच्या डाळीमध्ये किडे होऊ नयेत म्हणून बरणीमध्ये डाळ भरताना त्यात थोड्या वाळलेल्या लाल मिरच्या टाकून ठेवा.5 / 6मसूर डाळीच्या डब्यात लसूण पाकळ्या घालून ठेवल्याने डाळीला भुंगे होणार नाहीत. 6 / 6उडीद किंवा तूर डाळीला किडे लागू नये म्हणून बरणीमध्ये हळकुंड घालून ठेवावे. धान्य जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी हे उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.