Join us

डाळींना भुंगा लागतो, तांदुळात अळ्या होतात? ४ टिप्स- धान्य अजिबात खराब होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 18:13 IST

1 / 6
वारंवार बाजारात जाऊन आणायला नको म्हणून आपण डाळ, तांदूळ एकदाच घेऊन साठवून ठेवतो. पण त्याचा नेमका उलटाच परिणाम होतो आणि डाळींना भुंगा लागतो तर तांदळात किडे, अळ्या होऊ लागतात.
2 / 6
असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायचं आणि कोणत्या डाळीमध्ये कोणते पदार्थ घालून ठेवायचे, याविषयीची माहिती आता पाहूया.. ही माहिती homestylebysheela या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
3 / 6
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तांदळात किडे होऊ नये म्हणून तांदळाच्या बरणीमध्ये तेजपान घालून ठेवावे.
4 / 6
हरबऱ्याच्या डाळीमध्ये किडे होऊ नयेत म्हणून बरणीमध्ये डाळ भरताना त्यात थोड्या वाळलेल्या लाल मिरच्या टाकून ठेवा.
5 / 6
मसूर डाळीच्या डब्यात लसूण पाकळ्या घालून ठेवल्याने डाळीला भुंगे होणार नाहीत.
6 / 6
उडीद किंवा तूर डाळीला किडे लागू नये म्हणून बरणीमध्ये हळकुंड घालून ठेवावे. धान्य जास्त दिवस साठवून ठेवण्यासाठी हे उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतात.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सस्वच्छता टिप्सहोम रेमेडी