Join us   

पितृपक्ष: घरोघरच्या रीतीभाती काय सांगतात, कोणते पदार्थ खावे-कोणते टाळावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 5:10 PM

1 / 8
पितृपक्षाला सुरूवात झाली आहे. घरोघर आपल्या पुर्वजांचे स्मरण केले जाते. याकाळात सात्विक आहार अनेकजण करतात. त्यासाठी काही धार्मिक बंधनही असतात. मात्र शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नये असा नियम अनेकजण मानतात.
2 / 8
पावसाळ्याच्या काळात बाहेरचे अन्न टाळणे, त्यामागे आजार टाळणे आणि शक्यतो आपल्या कुटुंबासह ताजे अन्नच आहारात घेणे अशी भावना असू शकते.
3 / 8
मुळा आणि गाजर अनेकजण याकाळात खात नाहीत. पितृ पक्षात मसूर डाळीचे सेवन करू नये असेही काहीजण मानतात.
4 / 8
पितृ पक्षात अरबीचे सेवन निषिद्ध मानले आहे, काहीजण कारली खात नाहीत. तर त्याउलट काहीजण कारल्याचे पंचामृत प्रसाद म्हणून खातात.
5 / 8
काहीजण याकाळात दूध पीत नाहीत. केवळ नैवेद्याला खीर करतात.
6 / 8
कुठल्याही प्रकारचे मांसाहार किंवा अपेयपान याकाळात अनेकजण टाळतात.
7 / 8
कुठलेही पदार्थ कच्चे खाणे काही भागात योग्य मानले जात नाही. विशेषत: धान्य कच्ची खाणे टाळतात.
8 / 8
जीरं, काळे मीठ, काळी मोहरी, काकडी आणि वांगी हे पदार्थही खाऊ नये असं काही आख्यायिका सांगतात.
टॅग्स : पितृपक्षकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न