Join us   

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ सांगतात २ सोप्या टिप्स- शुगर सतत वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 9:07 AM

1 / 6
भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात. कारण आपल्याकडे मधुमेहींचे प्रमाण खूप जास्त वाढते आहे. (2 important tips for controlling blood sugar level)
2 / 6
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे कमी वयातच डायबिटीजचा त्रास सुरू झालेले अनेक रुग्ण दिसतात. (how to control diabetes)
3 / 6
मधुमेह नियंत्रित ठेवायचा असेल तर साखर किंवा गोड पदार्थ कमीतकमी प्रमाणात खावेत, हे तर आपल्याला माहिती आहेच. पण त्यासोबतच तुमच्या रुटीनमध्ये थोडा बदल केला तर नक्कीच मधुमेह कंट्रोलमध्ये राहू शकतो..(how to control blood sugar spike?)
4 / 6
रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढू नये, यासाठी काय करावं, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी learn_with_podcasts या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
5 / 6
यामध्ये ते सांगतात की मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जेवल्यानंतर लगेच एका जागी बसून राहू नये. त्यांनी १० ते १५ मिनिटे चालावे. यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही.
6 / 6
दुसरी गोष्ट म्हणजे ग्लुटेनयुक्त पदार्थ त्यांनी पुर्णपणे वर्ज्य करावेत. कारण ग्लुटेन आतड्यात चिटकून बसते. पचायला जड जाते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे गव्हाच्या पोळ्या खाण्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा मिलेट्स रोटी- भाकरी खाण्यास अधिक प्राधान्य द्यावे.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह