Join us   

पावसाळ्यात मुलं शाळेत जातात आणि दुखणं घेऊन येतात-५ पदार्थ खाऊ घाला, इम्युनिटी भरपूर वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 9:10 AM

1 / 7
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मुलांना शाळेतून इन्फेक्शन होतं आणि ते आजारी पडतात. मग घरात एकेक करून असे संसर्गजन्य आजार सगळ्यांनाच होतात.
2 / 7
मुलांचं आणि घरातल्या सगळ्याच सदस्यांचं आजारपण टाळायचं असेल तर मुलांना पावसाळ्याच्या दिवसांत काही पदार्थ आवर्जून खाऊ घाला. जेणेकरून त्यांची रेागप्रतिकारक शक्ती वाढेल आणि ते वारंवार आजारी पडणार नाहीत.
3 / 7
kangarookids.in यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना हळदीचा काढा किंवा हळदीचं दूध नियमितपणे द्या. कारण हळदीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी इन्फ्लामेट्री घटक भरपूर प्रमाणात असतात.
4 / 7
तुमच्या स्वयंपाकात आल्याचा वापर करा. कारण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आलं अतिशय उपयुक्त ठरतं.
5 / 7
लसूणामध्ये ॲलिसिन हा घटक असतो. शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढविण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. लसूण उष्ण असल्याने त्याचे नियमित सेवन केल्यास त्याने वारंवार सर्दी होत नाही.
6 / 7
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी देणारे लिंबूवर्गीय फळंही नियमितपणे मुलांना खायला द्या.
7 / 7
बदामामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बदाम खाणं फायदेशीर ठरतं.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलंअन्नमोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण