Join us  

'ये दूरियां भी है जरूरी!’ नात्यात ब्रेक घेण्याचा तरुण जोडप्यांचा नवा ट्रेण्ड, कचाकचा भांडण्यापेक्षा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2024 2:00 PM

Taking a break in a relationship: why, when, and how to do it : जर रिलेशनशिपमध्ये दोघांमध्येही भांडणं होत असतील तर; नात्याला ब्रेकची गरज आहे..

कधीकधी नात्यात दुरावा असणं गरजेचं आहे (Relationship). असं म्हणतात नात्यातील दुराव्यामुळे रिलेशनशिपमधलं बॉण्ड अधिक घट्ट होतं. आपण जेव्हा एकाच व्यक्तीसोबत राहतो, तेव्हा नात्यातील नवीनता किंवा उत्साह कमी होतो (Break in ). ज्यामुळे नात्यातही अंतर वाढत जातो. अशा परिस्थितीत अनेक नकारात्मक विचार येऊ लागतात, ज्यामुळे नातेसंबंध बिघडू लागतात. त्यामुळे बरेच जण नात्यात ब्रेक घेतात.

ब्रेक घेतल्याने, वैयक्तिक विचार आणि भावना समजून घेण्यासाठी वेळ मिळतो. जोडीदाराप्रती असलेलं प्रेम वाढतं. आपण एकमेकांना मिस करतो, आणि त्यामुळे जोडीदाराचे महत्व कळू लागते. त्यामुळे नात्यात अंतर का गरजेचं आहे? यामुळे नात्याला नवी वळण मिळते का? नात्यात अंतर कधी द्यावे?(Taking a break in a relationship: why, when, and how to do it).

नात्यात अंतर कधी द्यावे?

वारंवार भांडणं

जर दोघांमध्ये वारंवार छोट्या - छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतील, मतभेद होत असतील तर, नात्याला थोडा ब्रेक देऊन पाहा. एकमेकांपासून थोडे अंतर ठेवा. यामुळे आपल्याला एकमेकांचे महत्व कळून येईल.

ऐश्वर्या रायसारख्या दिसणाऱ्या बाहुलीची व्हायरल चर्चा, कुणाला आवडली तर कुणी म्हणे किती ते गचाळ काम..

भावनिक थकवा

जर दोघांना मानसिक आणि भावनिकरित्या स्ट्रेस वाटत असेल तर, स्वतःला थोडा वेळ द्या. सततची भांडणं आणि ताणतणावामुळे आपल्याला भावनिकरित्या थकल्यासारखे वाटते. पार्टनरला थोड्या काळासाठी अंतर दिल्याने आपल्याला फ्रेश वाटू शकते.

दाणेदार रवाळ तूप तयार करताना घरभर वास पसरतो? लक्षात ठेवा १ ट्रिक; तूप होईल झटपट आणि..

प्रेम आणि आदराचा अभाव

जर आपल्याला वाटत असेल, तुमचा जोडीदार तुमची काळजी घेत नाही, नात्यात प्रेम आणि आदराची कमतरता आहे किंवा तुम्ही दोघेही एकमेकांना नीट समजून घेऊ शकत नाही, तर ब्रेक घ्या. एकमेकांचे महत्त्व समजून घेण्यासाठी नात्याला अंतर देणं गरजेचं आहे. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप