Join us  

शेवटच्या क्षणीही ‘त्यानं’ साथ सोडली नाही, प्रेयसीचे निधन झाल्यावर निरोप देताना तिला कुंकू लावत तो म्हणाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 3:04 PM

Social Viral Assam आजपर्यंत अनेक प्रेमवीरांच्या लव्ह स्टोरी ऐकून भावूक झाला असाल, आसाममधील ही लव्ह स्टोरी देखील आपल्या डोळ्यात पाणी आणेल.

आजतागायत आपण हिर रांझा, लैला मजनू, शीरी फरहाद यांसारख्या प्रेमवीरांचे लव्ह स्टोरी ऐकून मोठे झालो आहोत. चित्रपटातील काही हटके लव्ह स्टोरी देखील आपल्याला खरे प्रेम काय असते याची अनुभूती देतात. 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात एक फेमस डायलॉग आहे, जो आजही तरुणाईंमध्ये जिवंत आहे. ''हम एक बार जीते हैं, एक बार मरते हैं, शादी भी एक बार होती है, और प्यार भी एक ही बार होता है…”. असाच काहीसा प्रकार आसाम येथे दिसून आला आहे. एका प्रियकराने चक्क आपल्या प्रेयसीच्या मृतदेहाशी लग्न केलं. तिला निरोप देताना कुंकू लावून म्हणाला की आता यानंतर दुसऱ्या कुणाचाही विचार मी करणार नाही.   सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

तर ही प्रेम कहाणी आहे आसाममधल्या एका छोट्याश्या गावातली. २७ वर्षीय बिटुपन तमुली २४ वर्षीय प्रार्थना बोराच्या प्रेमात पडला. अनेक वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. या लव्ह बर्ड्सचं प्रेम प्रकरण अख्ख्या गावाला माहित पडलं होतं. ते दोघे लवकरच विवाह बंधनात अडकणार होते. मात्र, प्रार्थनाचा एका दीर्घ आजाराने मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर बिटुपनला मानसिक धक्का बसला. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जेव्हा करण्यात येत होते. तेव्हा तिच्या पार्थिवाच्या साक्षीनं त्यानं आजन्म अविवाहित राहण्याची शपथ घेतली. लक्षवेधी बाब म्हणजे सर्व गावकऱ्यांसमोर त्यानं तिच्या भांगात कुंकू भरले. हे दृश्य पाहून मुलीचे कुटुंबीय देखील भावुक झाले.

त्याची ती अवस्था पाहून तुमच्या डोळ्यांत देखील पाणी येईल. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील भावुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या असून, सोशल मिडीयावर या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे, हा व्हिडिओ पाहून एकच गोष्ट मनात येते ती म्हणजे प्रेम हवं तर असं, शेवटपर्यंत सोबत देणारं..

टॅग्स :सोशल व्हायरलआसामसोशल मीडिया