येथील ग्रामपंचायतीमध्ये १३ सदस्य कार्यरत आहेत. सरपंच मिळून एकूण १४ सदस्य आहेत. दत्तात्रेय कोळी ग्रामसेवक आहेत. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य सौरभ पाटील, अकबर मुल्ला, प्रशांत कुंभार, सारिका तुकाराम गायकवाड, पूनम सागर नांगरे, रूपाली प्रमोद पाटील, अमोल पाटील, सुशीला पाटील या आठ सदस्यांनी पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे.
राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, ग्रामसेवक कोळी आम्हाला विचारात घेत नाहीत. कोणतेही काम सांगितले असता, उडवाउडवीची उत्तरे देतात. अपमानास्पद वागणूक देतात. त्यामुळे त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत.
चौकट
आठ सदस्यांचे राजीनामे मंजूर झाले, तर गावात मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.