शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची परवड...!

By admin | Published: March 22, 2015 11:18 PM

तालुक्यात १४ केंद्रांवर चौथीचे १३६९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ८ केंद्रांवर सातवीचे ९८९ विद्यार्थी बसले आहेत.

राजापूर : पंचायत समिती शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ आणि शहरातील विश्वनाथ विद्यालयातील केंद्र संचालकांच्या गलथान कारभाराचा फटका रविवारी या केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांना बसला. या परीक्षा केंद्रावर निम्म्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बेंचवर, तर उर्वरित विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जमिनीवर करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.याप्रकरणी पंचायत समिती सदस्या व माजी उपसभापती भाग्यश्री लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी व शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. पंचायत समितीच्या मासिक बैठकीतही या प्रश्नी शिक्षण विभागाला आम्ही जाब विचारू, असेही लाड यांनी यावेळी सांगितले.रविवारी, २२ मार्च रोजी राज्यात सर्वत्र चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. राजापूर तालुक्यात १४ केंद्रांवर चौथीचे १३६९ विद्यार्थी परीक्षेला बसले असून, ८ केंद्रांवर सातवीचे ९८९ विद्यार्थी बसले आहेत. शहरातील विश्वनाथ विद्यालयात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेचे केंद्र असून, या ठिकाणी एकूण १८८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुयोग्य बैठक व्यवस्थेबाबत कोणतेच नियोजन करण्यात आले नव्हते. ऐनवेळी यातील निम्मे विद्यार्थी बेंचवर, तर निम्मे विद्यार्थी जमिनीवर बसले होते. यातील आठ ते दहा विद्यार्थ्यांना विश्वनाथ विद्यालयाच्या वरील मजल्यावरील जिन्याच्या कोपऱ्यात बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या या अशा बेंच व खाली जमिनीवरच्या विसंगत बैठक व्यवस्थेबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी उपस्थित गटशिक्षणाधिकारी प्रकाश ढाले, विस्तार अधिकारी संतोष सोळंकी, केंद्र संचालक रमेश धुळप यांना याचा जाब विचारला. यावेळी बेंचची संख्या अपुरी असल्याचे कारण सांगण्यात आले. त्यानंतर समोरील गोखले कन्याशाळेत विद्यार्थ्यांना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेथेही पुरेशा बेंच नसल्याने पुन्हा काही मुलांना खाली बसावे लागणार असल्याने व परीक्षेची वेळ जवळ आल्याने मग पालकांनीच सामंजस्याची भूमिका घेत पूर्वी होते तेथेच विद्यार्थ्यांना बसविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथे बसविण्यात आले व परीक्षा सुरळीत सुरू झाली. जिन्याच्या कोपऱ्यात बसविलेल्या त्या आठ ते दहा विद्यार्थ्यांना मात्र पालकांनी विश्वनाथ विद्यालयाच्या खालील रिकाम्या खोलीत बसविण्याची मागणी केली व ती केंद्रसंचालकांनी मान्य करत त्यांना खालील वर्गात बेंचवर बसविले. काही वर्गात तर प्रकाश व्यवस्थाही पुरेशी नसल्याने पालकांनी याबाबतही नाराजी व्यक्त केली.या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अगोदरच लगतच्या गोखले कन्याशाळा व राजापूर हायस्कूलच्या इमारतीत वर्ग का घेतला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बोर्डाकडून २० विद्यार्थ्यांचा एक वर्ग अशा प्रकारे या परीक्षेसाठी नियोजन केले जावे, अशी मागणीही होत आहे.(प्रतिनिधी)विश्वनाथ विद्यालयातील केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा असो, एमटीएस परीक्षा असो वा अन्य कोणती परीक्षा असो, बैठक व्यवस्थेबाबत नेहमीच गोंधळ असतो. शिक्षण विभाग आणि केंद्र संचालक याबाबत काहीच दखल घेत नाहीत, अशी कैफियतही अनेक पालकांनी यावेळी मांडली. रविवारी होणाऱ्या या परीक्षेबाबत गटशिक्षणाधिकारी, केंद्र संचालक यांनी अगोदरच योग्य नियोजन का केले नाही? असा सवाल केला जात आहे.